शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दप्तर दिरंगाईबाबत सदस्यांकडून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 21:21 IST

मनपा स्थायी समिती : पाणी, आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास कारवाईचा इशारा

धुळे : निविदा काढण्याची प्रक्रिया संथगतीने सुरु असून दप्तर दिरंगाई मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याचा परिणाम कामावर जाणवत आहे. वर्ष उलटून जाते तरीही काम मार्गी लागत नाही असे सांगत दप्तर दिरंगाईच्या कार्यपध्दतीवर महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आरोग्य आणि पाणीपुरवठ्याकडे कुणी दुर्लक्ष केल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुध्द कारवाईचा इशारा आयुक्त अजीज शेख यांनी दिला.

महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आयुक्त अजीज शेख, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य सुनील बैसाणे, भारती माळी, मंगला पाटील, पुष्पा बोरसे, अमोल मासुळे, कमलेश देवरे, हिना पठाण, सईद बेग हाशम बेग, शितल नवले, नागसेन बोरसे, किरण कुलेवार, वैशाली वराडे, बन्सीलाल जाधव, अमीन पटेल तसेच अधिकारी उपस्थित होते.

अजेंड्यावरील ११ विषयांवर चर्चा करण्यात आली. महापालिका बाजार विभागाने मनपाच्या मालकीचे दुकाने, ओटे, गाळे, जागा यांना शास्ती फी माफी आयुक्तांच्या आदेशानुसार, जाहीर करण्यात आल्याच्या विषयावर चर्चा झाली. यावर नागसेन बोरसे, शितल नवले, सुनील बैसाणे, कमलेश देवरे, भारती माळी, अमोल मासुळे यांनी सहभाग घेतला. वर्षभर कोरोनाने थैमान घातले. अनेकांना रोजगार नाही. व्यवसाय होत नाही. आर्थिक स्थिती बिघडली आहे. कर भरण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. नागरिकांनाही शास्ती माफी द्यावी. सक्तीने वसुली करु नये असे नागसेन बोरसे म्हणाले. सुनील बैसाणे म्हणाले, नागरिकांना शास्तीमाफी द्यायला हवी. जे नागरिक नियमित कर भरतात त्यांना करात सुट द्यावी. थकबाकीदारांची दुकाने सील न करता त्यांना मुदत देण्यात यावी. कमलेश देवरे यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला. यावर शास्ती माफीचा निर्णय आयुक्तांनी लवकर घ्यावा, असे सभापती जाधव म्हणाले.

जलशुध्दीकरण केंद्रावर क्लोरीन टर्नर गॅसचा पुरवठा करण्याबाबत तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. नेहमीच दप्तर दिरंगाई होत आहे. महिना-महिना निविदा प्रक्रिया पूर्ण होत नाही. पारंपरिक पध्दत बंद झाली पाहिजे. किंवा त्यात बदल करावा. कर्मचारी संख्या कमी असल्याने त्याचा देखील परिणाम कामांवर जाणवतो. कर्मचारी संख्या वाढवायला हवी. दप्तर दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईची मागणी शितल नवले यांनी केली.

पाणी सोडत असताना ते फिल्टर करुनच सोडायला हवे. शुध्दीकरण न करता पाणी सोडणे हेे चुकीचेच आहे. त्याचे समर्थन केले जाणार नाही. असे आढळून आल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई केली जाईल असे आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे