शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे लहान मुले झाली मोटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST

वजन वाढण्याचे कारण कोरोना महामारीच्या काळात शाळा, कॉलेज, क्लास तसेच मैदानी खेळ बंद असल्याने मुलांना टीव्ही व मोबाइलशिवाय पर्याय ...

वजन वाढण्याचे कारण

कोरोना महामारीच्या काळात शाळा, कॉलेज, क्लास तसेच मैदानी खेळ बंद असल्याने मुलांना टीव्ही व मोबाइलशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अनेकांना या काळात हे व्यसन जडले आहे. त्यामुळे लहान मुलांमधील लठ्ठपणा ही पालकांसाठी फार मोठी समस्या झाली आहे. काही मुले हे लहानपणापासूनच लठ्ठ असतात. या वाढत्या लठ्ठपणामुळे त्यांचा शारीरिक फिटनेस व्यवस्थित राहत नाही. त्यामुळे मुलांना शिक्षणामध्ये आणि इतर खेळांमध्ये मन लागत नाही. शारीरिक फिटनेस जर चांगला असेल, तर मुले शिक्षणामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये यशस्वी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी

फळांमुळे मुलांमध्ये स्मरणशक्ती वाढते व मेटाबोलिजम सुधारते. मुलांना मधल्या वेळेत थोडी फळे दिल्याने मुलांचे पोट भरेल. त्यामुळे ते वजन वाढवणारे इतर पदार्थ खाणार नाहीत. पालकांनी मुलांच्या पौष्टिक खाण्यावर भर द्यावा. ज्यामध्ये उदाहरणार्थ गहू, ओटस्‌, बार्ली, वाटाणे सोयाबीनसारख्या पौष्टिक धान्यामुळे मेंदू कार्यक्षम होतो व शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते या पदार्थांमुळे मुलांची भूक व्यवस्थित बांधल्यामुळे बाहेरचे खाद्यपदार्थ ते कमी खातात. मुलांना दूध खूप आवडते. दुधातून कॅल्शियम मिळते. मुलांना नियमित दूध द्यावे. पालकांनी मुलांना ड्रायफ्रूट खाण्यास द्यावे. ड्रायफ्रुटस्‌मध्ये उदाहरणार्थ अक्रोड, बदाममध्ये जिंगसारखे पोषणमूल्य असते.

मुले टीव्ही, मोबाइल सोडतच नाहीत

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय, तसेच क्लासेस बंद आहेत. त्यामुळे मुलांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मात्र, यामुळे मुलांना मोबाइलचे व्यसन जडले आहे. मुलांना रागविल्यावरदेखील काही उपयोग होत नाही.

-प्राजक्ता पुराणिक, पालक

लॉकडाऊन काळात सर्वांनी घरीच थांबण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे मुलांना बाहेर जाण्यासाठी थांबविता यावे, यासाठी टीव्ही आणि मोबाइल हा एकमेव पर्याय होता. अशा काळात मुलांना मोबाइलचे व्यसन जडले. आता लॉकडाऊन जरी नसले तरी मुले मोबाइल सोडत नाहीत.

-विजय पाटील, पालक

सकस आहार द्यावा

मुले सध्या मोबाइल, टीव्हीचा वापर सर्वाधिक करीत आहेत. त्यामुळे एकाच जागेवर बसून राहिल्याने लठ्ठपणा जाणवत आहे. मुलांना लठ्ठ होण्यापासुन टाळण्यासाठी मुलांच्या आहारात भाजी, पोळी, पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा, फळे आवर्जून द्यावीत. चरबीयुक्त पदार्थ शक्यतो टाळावीत. केक, चॉकलेट, तसेच बाहेरील पदार्थ टाळणे गरजचे आहे.

-डॉ. अभिनय दरवडे, बालरोगतज्ज्ञ, धुळे

मुलांसोबत खेळा

मुलांना एकाच ठिकाणी बसवून ठेवू नका. सकाळी, सायंकाळी पालकांनी मुलांसोबत बाहेर फिरण्यासाठी जावे, मैदानी खेळ खेळावेत, तसेच आहारात पालेभाज्या, फळांचा वापर करावा, तसेच चरबीयुक्त पदार्थ टाळावेत.

-डॉ. दीपक पाटील