शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणी पुरवठ्यावरून ग्रामसभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:41 IST

गुरुवारी सकाळी ९ वाजता ग्रामसभेला हजारो लोकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली अध्यक्षस्थानी ...

गुरुवारी सकाळी ९ वाजता ग्रामसभेला हजारो लोकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली अध्यक्षस्थानी सरपंच सोनीबाई गंगाराम भिल, होत्या. यावेळी उपसरपंच प्रा. अंकिता पाटील, सर्व सदस्य त्याचबरोबर

सचिव तथा ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे उपस्थित होते.

ग्रामसेवक प्रवीण ठाकरे विषयांचे वाचन करीत असताना ग्रामसभेत सर्वप्रथम ग्रामस्थांकडून अतिक्रमणाचा विषय निघाला. जलशुद्धीकरण केंद्राजवळ गटनेते भगवान विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण व सुसज्ज व्यायामशाळा १० लाख रुपये निधी खर्च करून बांधण्यात येणार आहे त्यासाठी येथील ९ हजार स्क्वेअर फूट अतिक्रमित झालेली जागा व्यायामशाळेच्या बांधकामासाठी ग्रामसभेत देण्यात आली. यानंतर गावातील सर्व अतिक्रमण ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावे. ज्या व्यावसायिकाकडे ग्रामपंचायतीने जेवढी लिखित जागा दिलेली आहे त्या व्यतिरिक्त उर्वरित सर्व अतिक्रमित जागा ग्रामपंचायतने जमा करून त्या ठिकाणी ग्रामपंचायत मालकीचा बोर्ड लावण्यात यावा अशी सूचना ठेकेदार महेंद्र रामचंद्र पाटील यांनी केली. यानंतर महेश रोहिदास पाटील म्हणाले की गावातील काही ग्रामस्थांना अल्पशा भाडेतत्त्वावर ग्रामपंचायत मालकीच्या जागा व इमारती दिलेल्या आहेत ती सर्व मालमत्ता ग्रामपंचायतने ताब्यात घ्यावी.

इथून ग्रामसभेला वाद उफाळला-

कापडणे गावातील आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेने शहीद स्मारक उभारण्यासाठी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ डाव्या बाजूला १०० बाय १०० स्क्वेअर फुटाची जागा केल्याने ग्रामस्थांमध्ये गदारोळ सुरू झाला. शहीद स्मारकासाठी जागा देण्याचे ग्रामसभेने मान्यही केले मात्र जागेच्या विषयावरून चांगलाच गोंधळ झाला.

कापडणे गावात २००८ मध्ये ३ कोटी ११ लक्ष रुपयाची पाणीपुरवठा योजनेच्या बांधकामास प्रारंभ झाला. बांधकाम अनेक वर्षांपासून पूर्णत्वास आले. मात्र काम निकृष्ट असल्याने आजही ती योजना ग्रामपंचायतने ताब्यात घेतलेली नाही. गावाला आजही दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात आहे गावाला शुद्ध पाणी मिळावे म्हणून आमदार कुणाल पाटील व गटनेते भगवान पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड-दोन वर्षांपूर्वी गडीवर १६ लाख रुपये खर्च करून पाणी फिल्टर प्लांट उभारला आहे. मात्र तोदेखील ग्रामपंचायतने अद्याप सुरू केलेला नाही. यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. सामाजिक कार्यकर्ते चंदू पाटील यांनी दूषित पाण्याचा कॅन भरून ग्रामपंचायत प्रशासनाला दाखवत होते.

ग्रामसभेच्या अजेंड्यावर तब्बल ५०-५५ विषय होते. मात्र गदारोळ वाढल्याने, केवळ दोन-तीन विषयांवरच चर्चा झाली. तब्बल दोन-अडीच तास ग्रामसभा होऊनही ग्रामस्थांच्या गटात आरोप-प्रत्यारोप, सुरू होते. गोंधळ वाढत असल्याचे बघून ग्रामसभा तहकूब करून सरपंचासह इतर सदस्यांनी काढता पाय घेतला.

गोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी सोनगीर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. कोणीच ऐकून घेत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.