शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार; अनेक प्रश्न अनुत्तरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST

कोरोनामुळे गेल्यावर्षी दहावी बोर्डाच्या परीक्षेचा केवळ एकच पेपर रद्द करावा लागला होता. यावर्षी तर पूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आलेली ...

कोरोनामुळे गेल्यावर्षी दहावी बोर्डाच्या परीक्षेचा केवळ एकच पेपर रद्द करावा लागला होता. यावर्षी तर पूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे अकरावीचे प्रवेश कसे होणार? विद्यार्थ्यांना मिळालेले गुण कसे समजणार हा प्रश्न आहे.

जिल्ह्यात यावर्षी जवळपास २५ हजार विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ होणार होते. दहावीत उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे असतो. विज्ञान शाखेसाठी गुणवत्ता यादी जाहीर होत असते. त्यानुसारच विद्यार्थ्यांचा कनिष्ठ महाविद्यालयात नंबर लागत असतो. यावेळी तर परीक्षाच रद्द झाल्याने, गुणांचा प्रश्नच नाही. धुळे जिल्ह्यात ११वीसाठी तब्बल २६ हजार एवढी प्रवेशक्षमता आहे. मात्र आता शासनाने ११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा विचार करीत आहे. मात्र विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुणांचे मूल्यांकन कशा पद्धतीने होणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.

दहावीनंतर अनेक विद्यार्थी तांत्रिक व्यवसाय अभ्यासक्रमाला प्राधान्य देत असतात. असे विद्यार्थी दहावीनंतर तंत्रनिकेतन, आयटीआयला प्रवेश घेत असतात. या दोन्ही ठिकाणी दहावीच्या गुणांवरच प्रवेश मिळत असतो. आता परीक्षाच नाही तर केवळ सीईटीवर प्रवेश मिळणार.

ॲानलाईन सीईटी झाली तर ग्रामीण भागाचे काय?

ग्रामीण भागात नेटच्या पुरेशा प्रमाणात सुविधा नाहीत. नेटअभावी अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अडचणी आल्या होत्या. अशातच ॲानलाइन सीईटी परीक्षा झाल्यास त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑफलाइन झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढेल

सीईटीची ऑफलाइन परीक्षा झाल्यास, एकाच केंद्रावर अनेक विद्यार्थी एकत्र येतील, यात एखादा बाधित असल्यास त्याची लागण इतरांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

अंतर्गत मूल्यमापन कसे होणार?

यावर्षी दहावीचे वर्ग ऑनलाइनच झालेले आहेत. सहामाही परीक्षा झालेली नाही. तर केवळ प्रिलियम परीक्षा झालेली आहे. काही ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षा झालेली आहे. या दोन परीक्षांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना गुण मिळणार का?असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

दहावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली असल्याने, सर्व विद्यार्थी पास असतील. पण पुढील वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटीद्वारेच प्रवेश मिळेल.विद्यार्थ्यांचा अभ्यास नसला तरी त्या परीक्षेतूनच पुढील प्रवेश होणार आहे.

- अविनाश देवरे,

शिक्षक, पिंपळनेर

सीईटी ही पात्रता परीक्षा असली तरी ती प्रत्येक वर्गासाठी घेतली जात असते. विद्यार्थ्याला गुण किती मिळाले हे माहिती नसले तरी भविष्यात होणाऱ्या परीक्षेसाठी सीईटी फायदेशीर ठरेल हे निश्चित.

- आशिष कुंवर,

शिक्षक, पिंपळनेर

अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने ऑनलाइन सर्वेक्षण केले. हे सर्वेक्षण ऑनलाइन झाल्याने अनेक विद्यार्थी आपले मत नोंदवू शकले नाहीत. सीईटी घेणे म्हणजे ऑफलाइन परीक्षा घेणे आहे. कोरोनाच्या काळात ही परीक्षा घेणे अडचणीचे ठरेल. - बी.सी.सोनार,

शिक्षक, दोंडाईचा