शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

८० टक्के बसेस झाल्या सुरू; केवळ २० टक्के बसेस आगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST

धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बससेवा सुरै झाली आहे. जिल्ह्यातील ८० टक्के बसेस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. केवळ ...

धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बससेवा सुरै झाली आहे. जिल्ह्यातील ८० टक्के बसेस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. केवळ २० टक्के बसेस आगारातच थांबलेल्या आहेत. बस सुरै न झाल्याने काही गावातील नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर निर्बंध कडक करण्यात आले होते. मे महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच मृत्यूदरही कमी झाला आहे. त्यामुळे निर्बंध हटवून बससेवादेखील सुरु करण्यात आली होती. बससेवा सुरु झाल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मिळाली. तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहरात येण्यासाठी नागरिकांना एसटी महामंडळाच्या बसचा मोठा आधार असतो. मात्र कोरोना आल्यानंतर मागील दीड वर्षापासून बससेवा कधी बंद तर कधी सुरु असते. त्याचा मोठा फटका महामंडळाला बसतो आहे. तसेच आरोग्याच्या कामासाठी किंवा शासकीय कार्यालयातील कामासाठी येणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय होत होती. मात्र आता बसेस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्याने वाहक व चालकांमध्येही उत्साह दिसून येत आहे.

या गावांना बस कधी सुरू होणार?

लांब पल्ल्याच्या सर्व बसेस सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील बसफेऱ्यांचे प्रमाण मात्र त्या तुलनेत कमी आहे. शिरपूर तालुक्यातील सांगवी, पळासनेर, रोहिणी, खंबाडे या गावांना अजूनही बसची प्रतीक्षा आहे.

बस सुरू न झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच साक्री तालुक्यातील मांजरी, विरखेल, पारगाव या गावातही बस सुरू झालेली नाही.

प्रवाशांना खासगी गाड्यांचाच आधार -

ज्या गावातील बसफेऱ्या सुरू झाल्या नाहीत तेथील लोकांना अजूनही खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे. तसेच ग्रामीण भागात सुरू झालेल्या फेऱ्यांचे प्रमाण कमी आहे. फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून केली जात आहे. टप्प्या-टप्प्याने ग्रामीण भागातील सर्व फेऱ्या सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

काय म्हणतात प्रवास करणारे...

बससेवा सुरू झाल्याने आनंद झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून बस बंद असल्याने शहरात येण्यासाठी खासगी वाहतूक व्यवस्थेचाच वापर करावा लागत होता. बस सुरू झाली असली तरी बहुतेक गावांच्या फेऱ्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. तसेच बसफेऱ्यांची संख्या वाढवावी.

- प्रवासी

साक्री तालुक्यातील बहुतेक आदिवासी भागातील बसफेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आदिवासी भागातील बसफेऱ्या सुरू झाल्या तर वेळ व श्रम दोन्ही वाचतील. लवकरात लवकर बसफेऱ्या सुरू कराव्यात.

- प्रवासी