शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

शिवसेना मंत्र्यांचा रस्ता तुम्ही अडवून दाखवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:36 AM

उस्मानाबाद : शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगाण गावून झाल्यावर आता तुम्हाला शेतकऱ्यांची आठवण झाली का? शिवसेनेने ...

उस्मानाबाद : शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगाण गावून झाल्यावर आता तुम्हाला शेतकऱ्यांची आठवण झाली का? शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी काय केले, ते विचारण्याची नैतिकताच उरली नाही. त्यामुळे शिवसेना मंत्र्यांचे रस्ते अडवून दाखवाच, असे आव्हान आमदार कैलास पाटील यांनी भाजप व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. भाजपचे केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे सिद्ध होत असल्याचे लक्षात येऊ लागल्यावर पत्रक काढून शिवसेनेवर आरोप करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. हे जनतेला समजत नाही, हा तुमचा गैरसमज आहे. शिवसेना काय करते अन् काय नाही याचा तुम्हाला चांगलाच अनुभव आहे शिवाय, हे मी तुम्हाला सांगतोय यासारखा तर योगच नसल्याचा टोला कैलास पाटील यांनी लगावला. शिवसेनेला हिशेब मागायची तुमच्यात व तुमच्या पक्षात नैतिकता उरली नाही. जेव्हा शिवसेनेने काय केले याचा हिशेब विचारता तेव्हा मागच्या ४० वर्षांच्या कारभाराचाही लेखाजोखा मांडावा. जिल्ह्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम शिवसेनेच्या फक्त दोन वर्षांच्या सत्तेत होत आहे, असा दावा करत कैलास पाटील यांनी यामुळेच विराेधकांना पोटशूळ उठल्याचे म्हटले आहे. कशावरही पत्रक काढून शिवसेनेला लक्ष्य करण्याचा तुमचा हेतू कधीच सफल होणार याची जाणीव ठेवावी. मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा प्रयत्न करून दाखवावा, असे आव्हानही कैलास पाटील यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना दिले.

विम्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू..

पीकविम्याच्या बाबतीत शिवसेनेने केंद्रात विमा कंपन्याचा करार रद्द करण्याची मागणी केली ती भाजप सरकारने नाकारली. भाजप सरकार व विमा कंपन्या यांचीच सेटलमेंट आहे. गेल्यावर्षी पीक विम्याच्या बाबतीत विमा कंपन्यांची मुजोरी उतरविण्यासाठी कायदेशीर मार्गाचा लढा शिवसेना देत आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे सोयाबीनच्या दरात घसरण होत असताना लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न केवीलवाणा असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.