शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

पिवळ्या सोन्याची झळाळी; मालामाल करेल की मृगजळ ठरेल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST

मागच्या पाच वर्षांत सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत तालुक्याची सोयाबीनचे कोठार अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. खरिपाच्या एकूण ...

मागच्या पाच वर्षांत सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत तालुक्याची सोयाबीनचे कोठार अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. खरिपाच्या एकूण क्षेत्रात ८० टक्क्यांवर घेतल्या जाणाऱ्या या पिकाचा अर्थकारणावर मोठा प्रभाव आहे. असे असले तरी हवामानाची अनुकूलता, रोगांचा प्रादुर्भाव, पेरणी ते काढणी दरम्यान लाभलेली वरुणराजाची साथ, बाजारभाव या सर्व बेभरवशाच्या स्थितीत पेरलं ते उगवेल का, उगवलेलं जगेल का, जगलेलं पदरात पडेल का अन् पदरी पडलेलं चांगल्या दरात विकेल का, याचा काही नेम नसतो. यंदा मात्र पेरणी ते काढणी या टप्यात प्रत्येकांच्या वावरात वेगवेगळे अनुभव असले तरी इकडे बाजारात मात्र मागच्या तीन महिन्यांत दरदिवशी दरात वृद्धी नोंदली गेली. आता हे पीक हाती येईल का? आले तर त्यास सध्याचा दर मिळेल का? की भरल्या बाजारात तो पुन्हा ‘बेभाव’ होणार याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

असा वाढला सोयाबीनचा पेरा

वर्ष पेरा (हेक्टर )

२०१७ ४८०००

२०१८ ५२०००

२०१९ ६३०००

२०२० ६५०००

२०२१ ६००००

बॉक्स १

झटपट अन् जास्त कालावधीचे सोयाबीन

ऐंशी ते नव्वद, नव्वद ते शंभर व शंभर ते ११० दिवस अशा झटपट, मध्यम व जास्त कालावधीत काढणीस येणारे सोयाबीन वाण याभागात घेतले जात असले तरी यास वाढ, फुलोरा व शेंगावस्थेत पूरक पाऊसपाणी समान गरजेचे असते अन् मिळणारा दर मात्र वेगवेगळा असतो. यंदा संपूर्ण हंगामात मात्र या दरात वृद्धी नोंदली आहे.

दरवृद्धी : पदरी पडेल की मृगजळ ठरेल

आगामी महिनाभर काढणी अन् मुख्य आवकीचा आहे. याकाळात आत्तापर्यंतचा ‘भाव’ आपल्यातील उठावातील स्थिरता कायम ठेवतो की ‘पिछे मुड’ असा पवित्रा घेतो याची काळजी शेतकऱ्यांना लागली आहे. काढणी हंगामाला निसर्गाची अन् काढणी झालेल्या मालाला बाजारातील दराची साथ मिळाली तरच शेतकरी मालामाल होणार आहे. नसता उभं पीक अन् दर दोन्ही शेतकऱ्यांसाठी मात्र मृगजळ ठरणार आहेत.

पिवळ्या सोन्याची झळाळी कायम राहिलं का?

सध्या झटपट येणाऱ्या व लवकर पेर झालेल्या सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. आगामी पंधरा दिवसांत उर्वरित फडास पक्वता येईल. यानंतरच्या पुढील पंधरवड्यात काढणीची लगबग सुरू होईल. यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आवक सुरू होईल. आवक वाढताच दर कमी होतो असा आजवरचा अनुभव आहे. यंदा हाच कित्ता गिरवला जातो की सातत्यपूर्ण होणारी दरवाढ शेतकऱ्यांना मालामाल करून जाते हे आगामी काळच ठरवणार आहे.