शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याचे भाव कोसळले; पत्ताकोबी, फ्लाॅवर कवडीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उस्मानाबाद : आवक वाढल्याने सर्वच भाज्यांचे दर रविवारच्या आठवडा बाजारात कोसळले. भाज्यांचे भाव कमी असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद : आवक वाढल्याने सर्वच भाज्यांचे दर रविवारच्या आठवडा बाजारात कोसळले. भाज्यांचे भाव कमी असल्याने ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळत आहे. मात्र, दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे.

भाजीपाला व फळभाज्यांसाठी मुबलक पाणीसाठा व पोषक वातावरण असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड केली आहे. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी, फळभाज्यांचे भाव कोसळू लागले आहेत. कांदा ४०, शिमला मिरची, दोडका, कारले ३० ते ४०, हिरवी मिरची, गवार ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. बटाटा १५ ते २०, वांगी, टाेमॅटो १० ते १५ रुपयांनी, पत्ताकोबी, फ्लॉवर १० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. शेवग्याचे दरही मागील आठड्यापासून उतरले असून, शेवगा ३० ते ४० रुपये किलोने विक्री होत आहे, तर दुसरीकडे तेलाच्या दरात प्रतिदिन वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे.

चौकटी

तूरडाळ ९५ रुपये

खाद्यतेलाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. सध्या सोयाबीन, पामतेल १२८ रुपये, सूर्यफूल तेल १७० रुपये प्रतिकिलो, मोहरी तेल १३० रुपये लीटर, हरभरा डाळ ६५, तूर डाळ ९६, उडीद डाळ ९०, मूगडाळ ९०, मसूर डाळ ६७ रुपये किलो दराने विक्री होत आहे.

डाळिंब महागले

बाजारात डाळिंबाची आवक कमी असल्यामुळे डाळिंब १६० ते २०० रुपये किलोने विक्री हाेत आहेत. सफरचंद १२० ते १८०, संत्रा ६०, चिकू ३० रुपये, द्राक्षे ६० ते ७०, खरबूज ३० रुपये प्रतिकिलो दराने तर ३० ते ४० रुपये प्रतिनगाप्रमाणे विक्री होत आहे.

भाज्या स्वस्त

फळ भाज्याबरोबरच पालेभाज्याही दर कमीच आहेत. मेथी, कोथिंबीर १० रुपयास दोन जुडी, पालक, शेपू १० रुपयास २ जुडी तर चुका १० रुपये जुडीप्रमाणे विक्री होत आहे. लिंबाला मागणी वाढल्याने लिंबू ३ रुपये नगाप्रमाणे विक्रीस होते.

सध्या बाजारात भाज्यांची आवक चांगली आहे. त्यामुळे दर कमीच आहेत. उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाज्यांचे दर वाढल्याची शक्यता आहे.

महादेव साठे, भाजीपाला विक्रेते

तेलाच्या दरात वाढ होत आहे. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत खाद्यतेलाचे दर २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. मूग, तूर, मसूर, उडीद, हरभरा डाळीचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

अमित भराटे, किराणा व्यावसायिक,

फळांच्या दरात वाढ झाली आहे. खाद्यतेलाचे भावही वाढत आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. भाज्यांचे दर आवाक्यात असल्यााने दिलासा काही अंशी दिलासा मिळत आहे.

- कैलास काळे, ग्राहक