शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
3
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
4
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
5
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
6
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
7
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
8
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
9
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
10
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
11
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
12
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
13
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
14
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
15
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
16
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
17
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
18
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
19
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
20
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीत शेतमजूर वाऱ्यावरच, मदत हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची जीवितहानी घडून आल्यास शेतकऱ्यांना मदतीची तरतूद आहे. मात्र, अनेक शेतमजूर हे पशुपालनही करतात. त्यांच्या ...

उस्मानाबाद : नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची जीवितहानी घडून आल्यास शेतकऱ्यांना मदतीची तरतूद आहे. मात्र, अनेक शेतमजूर हे पशुपालनही करतात. त्यांच्या पशूची हानी झाल्यास मदतीबाबत कसलीही तरतूद सध्या नाही. त्यामुळे या घटकातंर्गत लाभार्थी संकल्पनेची व्याप्ती वाढवून शेतमजुरांनाही मदत मिळण्याबाबत कार्यवाही व्हावी, असे साकडे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून घातले आहे. राज्याची अर्थव्यवस्था आजही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. साधारणतः ६० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून, यामध्ये भूमिहीन शेतमजुरांची संख्याही मोठी आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत उस्मानाबादेत किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातच शेतीला पूर, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. पिकांच्या नुकसानीसोबतच शेतकऱ्यांचा आधार असलेले पशुधन पाण्यात वाहून जाणे अथवा वीज पडून जनावरे दगावणे, अशा घटना घडून नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही गतवर्षीच्या अतिवृष्टीत व यावर्षीही अशा घटनांनी मोठे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई म्हणून महसूल व वन विभागाच्या २०१५ मधील शासन निर्णयानुसार आर्थिक मदत दिली जाते. परंतु, यामध्ये केवळ अत्यल्पभूधारक व अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच ही मदत मिळते. निकषांमध्ये शेतमजुरांचा समावेश नाही. एखाद्या शेतमजुराचे पशुधन नैसर्गिक आपत्तीमुळे दगावल्यास तो मदतीस पात्र ठरत नाही. शेतमजुराकडे उपजीविकेचे साधन म्हणून शेतजमीनही नसते. नैसर्गिक आपत्तीमुळे त्याच्या पशुधनाचे नुकसान झाल्यास त्यास फार मोठ्या आर्थिक विवंचनेस सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन मदतीस पात्र लाभार्थी निकषात सुधारणा होऊन शेतमजुरांनाही त्यात अंतर्भूत करावे, असे साकडे खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून घातले आहे.