शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीकडे दहा हजार वैयक्तिक क्लेम दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:36 IST

कळंब : सोयाबीनचे कोठार असलेल्या कळंब तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे गावोगावी उभे फड पाण्यात तरंगत आहेत. यासाठी ...

कळंब : सोयाबीनचे कोठार असलेल्या कळंब तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे गावोगावी उभे फड पाण्यात तरंगत आहेत. यासाठी आपली पिके विमा संरक्षित करून घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी दहा हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीचा ऑनलाइन ‘क्लेम’ दाखल केला आहे.

तालुक्यात खरीप हंगामात एकट्या सोयाबीनचा ६० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्रात याचा ऐंशी टक्के वाटा आहे. अशा प्रमुख पिकाचा सध्या काढणी हंगाम भरात आलेला आहे. मध्यंतरी २५ दिवसांचा पावसात खंड निर्माण झाला होता. यामुळे आधीच मोठे नुकसान झाले होते. या संकटातून वाचलेले पीक थोडेबहुत हाती पडेल अन् बाजारात वाढलेले दर घामाचे मोल करतील, अशी आशा लागली होती; परंतु फडातील सोयाबीनच्या शेंगा पक्वता अवस्थेत असताना काढणीसाठी मजुरांची जुळवाजुळव करतानाच अचानक निसर्गाने घाला घातला. यामुळे गावोगावी सोयाबीन पिकांचे आतोनात नुकसान झाले. नदीकाठची पिके तर चक्क पाण्यात तरंगत असून, इतर ठिकाणी अति पाण्याने चिबड लागले आहे. यामुळे आता चिखलमय, दलदलयुक्त वावरात पाय ठेवायचा कसा अन् त्यामधून पीक काढायचे कसे? यापेक्षा कुजलेले, अंकुर फुटत असलेले निकृष्ट प्रतवारीचे पीक काढले तरी घेणार कोण, असा प्रश्न शेतकऱ्यांची झोप उडवत आहे.

दरम्यान, तालुक्यात पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून, अशाच नुकसानीचे आजवर तब्बल दहा हजारांच्या आसपास ऑनलाइन क्लेम शेतकऱ्यांनी सादर केले आहेत. यातील ३ हजार ९०० शेतकऱ्यांच्या शेतात विमा कंपनीच्या १७ प्रतिनिधींनी ‘स्पॉट व्हिजिट’ दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चौकट...

सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र विमा संरक्षित...

यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध पिकांचे तब्बल ९५ हजार १६८ प्रस्ताव दाखल करून पिके विमा संरक्षित करून घेतली आहेत. यात सर्वाधिक ७४ हजार ७३३ प्रस्ताव सोयाबीन पिकाचे आहेत.

७२ तासांत नुकसानीचे इन्टिमेशन हवी...

राष्ट्रीय पीक विमा योजनेत पेरणी ते काढणीपश्चात पिकांना विमा संरक्षण आहे. अवेळी पावसाने काढणीच्या टप्प्यावर असलेल्या पिकांचे नुकसान झाले असल्यास याची वैयक्तिक माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीच्या ॲपवर ऑनलाइन नोंदवणे गरजेचे आहे, असे तालुका कृषी अधिकारी बी.बी. जाधव यांनी सांगितले.