शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे स्वच्छतेकडे होतेय दुर्लक्ष ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास समजले जाते. मात्र, कोरोना काळात बसेस अनेक महिने आगारात थांबून राहिल्याने बसेसची दुरवस्था ...

उस्मानाबाद : एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास समजले जाते. मात्र, कोरोना काळात बसेस अनेक महिने आगारात थांबून राहिल्याने बसेसची दुरवस्था झाली. काही बसेसचा पत्रा खिळखिळा झाला आहे. त्यामुळे रिमझिम पावसातही काही बसेला गळती लागत आहेत. शिवाय, बहुतांश बसेसची वेळोवेळी स्वच्छता राखली जात नसल्याने प्रवाशांत नाराजी व्यक्त केली जात आहे.

खाजगी वाहतूक सेवेला टक्कर देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन एसटी बसमध्ये सातत्याने बदल केले जात असतात. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे आजघडीला एसटी सेवा टिकून आहे. एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जात असल्याने प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. कोरोना काळात काही महिने बसेस आगारातच थांबून राहिल्याने अनेक बसेसची दुरवस्था झाली होती. महामंडळाने बसेसची डागडुजी केली आहे. बोटावर मोजण्याइतक्या बसेसचे पत्रे खराब आढळून येतात. मात्र, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची स्वच्छता राखली जात नसल्याचे आढळून आले. प्रवाशांकडूनही बसच्या खिडक्या तसेच आसनाच्या शेजारीची थुंकत असतात. त्यामुळे अन्य प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करीत प्रवास करावा लागतो. बसेसची वेळोवळी साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

कोट...

कोरोना काळात दीड महिने बसेस बंद होत्या. नादुरुस्त बसची दुरुस्ती केली आहे. बसमध्ये थुंकणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत असते. याबाबत वाहकांना सूचना देण्यात येणार आहेत.

पांडुरंग पाटील, आगार प्रमुख, उस्मानाबाद

एसटीचा कसरतीचा प्रवास

एसटी बसचा प्रवास हा सुरक्षित प्रवास आहे. त्यामुळे खाजगी वाहनाऐवजी एसटीने प्रवासाला प्राधान्य देतो. मात्र, अनेक आसने धुळीने माखलेली असतात. रुमालाने ते स्वच्छ करुन बसावे लागते.

विशाल मस्के, प्रवासी

खाजगी वाहनात स्वच्छता असते. एसटीच्या लांब पल्ल्याच्या बसेस वगळता ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची स्वच्छता ठेवली जात नाही. खिडकी, आसन थुंकून घाण झालेले असते. एसटीने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.

पृथ्वीराज माने, प्रवासी

गाड्यांचा मेंटेनन्स वाढला, पण पैसा नाही

जिल्ह्यातील उस्मानाबाद, भूम, परंडा, कळंब, उमरगा, तुळजापूर या सहा आगाराच्या एकूण ४२२ बसेस असून, यापैकी सध्या ३३० बसेस सुरु आहेत. प्रतिदिन ७५ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. यातून महामंडळास ३२ लाखाचे उत्पन्न मिळत आहे.

उस्मानाबाद आगाराच्या ७७ बसेस असून, या बसपैकी ७० बसेस दररोज धावत आहेत. आगारास ७ लाख रुपये उत्पन्न मिळते. डिझेलसाठी ६ लाख ५० हजार रुपये खर्च, पगारासाठी ४ लाख रुपये प्रतिदिन खर्च होतो. तर मेंटेनन्सला सुमारे ५० हजार रुपये खर्च करावे लागतात. उत्पन्न ७ लाख रुपये व खर्च ११ लाख रुपये होत आहे. अशीच स्थिती अन्य आगाराची आहे. सर्व बसेस सुरू झाल्यानंतर उत्पन्न वाढेल, अशी आशा एसटीला आहे.