शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
3
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
4
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
10
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
11
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
12
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
13
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
14
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
15
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
16
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
17
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
18
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
19
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
20
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
Daily Top 2Weekly Top 5

दर घसरलेे; दाेन एकरावरील टाेमॅटाेची झाडे उपटून बांधावर टाकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST

तामलवाडी (जि. उस्मानाबाद) -बाजारपेठेत टाेमॅटाेचे दर प्रचंड घसरले आहेत. त्यामुळे उत्पादनखर्च साेडा वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे ...

तामलवाडी (जि. उस्मानाबाद) -बाजारपेठेत टाेमॅटाेचे दर प्रचंड घसरले आहेत. त्यामुळे उत्पादनखर्च साेडा वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या धाेत्री येथील एका शेतकऱ्याने दाेन एकरावरील टाेमॅटाेची झाडे उपटून बांधावर टाकली. दरम्यान, शिवारातील अन्य भाजीपाला उत्पादक शेतकरीही अडचणीत आले आहेत.

तुळजापूर तालुक्यातील धोत्री शिवारातील साठवण तलावामुळे सिंचनाच्या क्षेत्रात माेठी वाढ झाली. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यात शेतकरी द्राक्षांसह अन्य फळबागांकडे वळले; परंतु, कालांतराने बदलत्या हवामानामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळले. शिवाजी साठे यांनी माळरानावर सुमारे २ एकर क्षेत्रात ठिबक सिंचनच्या सहाय्याने टाेमॅटाेची लागवड केली. याेग्य नियाेजन आणि पाण्याच्या साेयीमुळे टाेमॅटाेचे पीक जाेमदार आले हाेते. लागवड, फवारणी तसेच दाेरी बांधणीवर तब्बल दीड ते दाेन लाखांचा खर्च झाला. फळधारणा हाेऊन टाेमॅटाेची ताेडणी सुरू झाली तेव्हा बाजारात भावही चांगला हाेता. मात्र, मागील काही दिवसांत टाेमॅटाेचे दर प्रचंड घसरले आहेत. आता तर टाेमॅटाेला प्रतिकिलाे ३ रुपये असा दर मिळत आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांतून ताेडणी आणि वाहतूक खर्चही निघत नाही. त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी शिवाजी साठे यांनी सुमारे दाेन एकरावरील टाेमॅटाेची झाडे उपटून बांधावर टाकली आहेत. या पिकाच्या माध्यमातून आजवर झालेला उत्पादनखर्चही निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, धोत्री शिवारात दोडका, पडवळ, वांगे, काेथिंबीर आदी भाजीपाल्याखालील क्षेत्र माेठे आहे. याही भाजीपाल्याचे दर घसरू लागले आहेत. त्यामुळे संबंधित शेतकरी चिंतेत आहेत.

चाैकट...

अडीचशे हेक्टरवरील भाजीपाला धोक्यात...

कृष्णा खोरे साठवण तलावाच्या पाण्यावर धोत्री शिवारात दोडका, भोपळा, पडवळ, टोमेटो, कवाळे आदी भाजीपाला अडीचशे हेक्टर क्षेत्रावर उत्पादित केला जाताे. प्रतिदिन ५० टन भाजीपाला पाच टेम्पोद्वारे मुंबई, पुणे आदी बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविला जात आहे. मात्र, योग्य भाव मिळत नसल्याने विक्रीसाठी नेलेला भाजीपाला फुकट वाटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी अडचणीत आहेत.