शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन एज्युकेशनची मदार गुरुजींच्या माेबाईल ‘डेटा’वरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक मिळून जवळपास १ हजार ८९ शाळा चालविल्या जातात. या ...

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक मिळून जवळपास १ हजार ८९ शाळा चालविल्या जातात. या शाळेतून धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही साधारपणे लाखाच्या घरात आहे. मागील दीड ते दाेन वर्षांपासून काेराेनाचे संकट पाठ साेडायला तयार नाहीत. या संकटामुळे इतर क्षेत्रांसाेबतच शिक्षणक्षेत्राचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शाळा उघडण्यात आल्या असल्या तरी वर्गखाेल्या अन् बाकडेही रिकामेच आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्याचे शासनाकडून निर्देशित केले आहे. त्यानुसार ज्ञानदान करण्यात येत आहे. परंतु, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकाही शाळेकडे अधिकृत इंटरनेट कनेक्शन नाही. त्यामुळे आजघडीला तरी ऑनलाईन शिक्षणाची मदार पूर्णत: गुरुजींच्या माेबाईलमधील डेटापॅकवरच अवलंबून आहे. अशा विदारक स्थितीत ऑनलाईन शिक्षणाची ‘स्पीड’ वाढणार तरी कशी, असा प्रश्न सर्वसामान्य पालकांसह शिक्षणप्रेमींना पडू लागला आहे.

चाैकट...

खासगी माध्यमिकमध्येही नाही वेगळे चित्र...

जिल्हा परिषद शाळांतील इंटरनेट कनेक्शनची वस्तुस्थिती पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाला आत्मचिंतन करायला भाग पाडणारी आहे. असे असतानाच दुसरीकडे खासगी माध्यमिक शाळांतही फारशी वेगळी स्थिती नाही. काही बाेटावर माेजण्याइतपत शाळा साेडल्या तर उर्वरित शाळांमध्ये अधिकृत इंटरनेट कनेक्शनचा पत्ता नाही. त्यामुळे अशा शाळांतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण गुरुजींच्या माेबाईल डेटावरच निर्भर आहे.

ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय असते रे भाऊ?

माझ्या बाबाकडे माेठ्या काचेचा माेबाईल नाही. त्यावर केवळ फाेन येताे आणि दुसऱ्यांना लावता येताे. इंटरनेट चालत नाही. त्यामुळे मी माझ्या मित्राच्या घरी जावून त्याच्या बाबाच्या माेबाईलच्या सहाय्याने शिक्षण घेताे. माेबाईल नसलेल्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेत आहे.

-सचिन कदम, विद्यार्थी.

आमच्या घरी माेबाईल आहे. बाबा इंटरनेटचे पैसे भरतात. परंतु, स्पीड नसल्याने आमच्या शिक्षणात अडचणी येत आहेत. त्यामुळे शाळेत इंटरनेटची सुविधा असतील तर आमच्या अडचणी काहीप्रमाणात दूर झाल्या असत्या.

-विजय नाईक, विद्यार्थी.

सेसमधून व्हावी तरतूद

जिल्हा परिषद शाळेत गाेरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. काेराेनाचे संकट कधी सरेल हे काेणीच सांगू शकत नाही. त्यामुळे यापुढे आपणाला ऑनलाईन शिक्षणाची सवय ठेवावी लागणार आहे. यासाठी सर्व शाळांना सेस फंडातून अधिकृत इंटरनेट कनेक्शन देण्यात यावे.

- महेंद्र धुरगुडे, गटनेते, राष्ट्रवादी.