शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

चिखल, पाण्यातून शोधावी लागतेय शाळेची वाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:40 IST

बसवराज होनाजे जेवळी : लोहारा तालुक्यातील भोसगा येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी चिखलमय रस्त्यावरूनच ये-जा ...

बसवराज होनाजे

जेवळी : लोहारा तालुक्यातील भोसगा येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी चिखलमय रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत असून, यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी पालकांमधून केली जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील भोसगा पाटीपासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या धर्मवीर संभाजी विद्यालयात या शाळेसाठी भोसगा, दस्तापूर, कोळणूर पांढरी, तुगाव या चार गावांतील विद्यार्थी रोज शिक्षणासाठी पायी आणि सायकल घेऊन येत असतात. शाळेकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वनीकरणापासून आष्टाकासार गावाला जाणाऱ्या जुन्या रस्त्याचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांसोबतच वनीकरण कार्यालयाचे कर्मचारी तसेच शेतकरी शेतीकडे ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात; परंतु, पावसाळ्यात महामार्गापासून तीनशे फूट अंतरावर मोठ्या प्रमाणावर पाणी थांबते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना शाळेला जाण्यासाठी चिखल आणि घाण पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना तर शाळेपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर सायकली ठेवून पाण्यातून शाळा गाठावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या संस्थेच्या वतीने हा रस्ता होण्यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने हा त्रास कायमस्वरूपी सुरूच आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी पालकांमधून केली जात आहे.

कोट......

संस्थेच्या माध्यमातून शाळेच्या वतीने तहसीलदार आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांना निवेदन देऊन रस्ता तयार करण्यासाठी विनंती केली आहे. परंतु, आजपर्यंत तरी रस्ता झाला नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- तानाजी साळुंके, मुख्याध्यापक, भोसगा

सर्वच ठिकाणी शाळा बंद असतानाही येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑफलाईन शाळा सुरू ठेवली आहे. परंतु, पावसामुळे विद्यार्थ्यांना चिखल, पाण्यातून जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे.

- संजय मानाळे, पालक, भोसगा

अनेक वेळा मागणी करूनही संबंधित विभाग रस्ता करील का नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे आता ग्रामपंचायतीनेच आपल्या स्तरावर रस्त्यावर मुरूम टाकून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

- वैजीनाथ कागे, माजी उपसरपंच, भोसगा