शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’तील लेट लतिफांना नाेटिसेची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेतील लेट लतिफ अधिकारी, कर्मचाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी कडक धाेरण अवलंबिले ...

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेतील लेट लतिफ अधिकारी, कर्मचाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी कडक धाेरण अवलंबिले आहे. सकाळी ९.४५ वाजता स्वत: कार्यालयात दाखल झाल्यानंतर कधी बांधकाम, कधी शिक्षण, तर आराेग्य अशा वेगवेगळ्या विभागांतील हजेरीचे मस्टर अचानक ताब्यात घेतले जाते. यानंतर येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नाेटिसा बजावण्यात येत आहेत. नाेटिसांची मात्रा लेट लतिफांना चांगलीच लागू झाली आहे.

जिल्हा परिषदेची कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ एवढी आहे. मात्र, अनेक अधिकारी तसेच कर्मचारी सकाळी १०, कधी साडेदहा वाजता कार्यालयात येत असत. परंतु, ही बाब यापूर्वी काेणी फारशी गांभीर्याने घेतली गेली नव्हती. पदाधिकारी, जनतेतून ओरड झाल्यास तेवढ्यापुरती कारवाई केली जात असे. त्यामुळे कार्यालयीन कामानिमित्त येणाऱ्या लाेकांना ‘पहिले पाढे पंचावन्न’ या म्हणीचा प्रत्यय येत असे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे राहुल गुप्ता यांनी हाती घेतल्यानंतर लेट लतिफांना चाप लावण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते स्वत: नियमितपणे सकाळी ९.४५ वाजता कार्यालयात येतात. पाच-दहा मिनिटे थांबून आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विभागांची नावे देऊन तेथील हजेरी मस्टर जमा करून आणण्यास सांगतात. सदरील मस्टर ताब्यात घेतल्यानंतर उशिरा आलेल्यांना मस्टरवर स्वाक्षरी करता येत नाही. जे अधिकारी, कर्मचारी उशिरा आलेले असतात, त्यांना कारणे दाखवा नाेटीस बजावली जाते. आजवर एक-दाेन नव्हे तर जवळपास २५ जणांना ही नाेटीस देण्यात आली आहे. यांतील काहींचे खुलासे प्राप्त झाले असून काहींचे बाकी आहेत. ज्यांचे खुलासे समाधानकारक असतील, ते कारवाईच्या कचाट्यातून वाचतील. मात्र, असमाधानकारक खुलासे असणाऱ्यांविरुद्ध बडगा उगारण्यात येत आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांच्या अशा स्वरूपाच्या कार्यपद्धतीमुळे अधिकारी, कर्मचारी वेळेच्या आत आपल्या खुर्चीवर विराजमान हाेताहेत. तसेच दिवसभरही चहा अथवा अन्य कारणांसाठी फारशी खुर्ची साेडताना दिसत नाहीत, हे विशेष !

चाैकट...

नियमित हाेते राष्ट्रगीत

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात नियमितपणे राष्ट्रगीत हाेते. त्यामुळे राष्ट्रगीतासाठी जवळपास सर्वच अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेपूर्वी हजार असतात.

काेट...

सीईओ पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळा पाळत नसल्याचे समाेर आले. हा प्रकार कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने याेग्य नाही. लेट लतिफांना चाप बसावा, यासाठी मी स्वत: सकाळी ९.४५ पूर्वी कार्यालयात हजर असताे. यानंतर काही मिनिटांनी वेगवेगळ्या विभागांतील हजेरी मस्टर्स जमा केली जातात. यानंतर येणाऱ्याना नाेटिसा बजावण्यात येत आहेत. आजवर २५ जणांना नाेटिसा दिल्या आहेत.

- राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद