शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

वीज तोडाल तर रस्त्यावर फिरु देणार नाही; हल्लाबोल आंदोलनातून अजित पवारांचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 4:04 PM

यापुढे शेतकर्‍यांची वीज तोडाल तर महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी उस्मानाबादेतून दिला़ 

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या मराठवाड्यातील दुसर्‍या टप्प्यास तुळजापुरातून सुरुवात झाली़ यावेळी अजित पवार म्हणाले, भाजप-सेनेचे सरकार फसवे सरकार आहे़ ते बोलतात एक अन् करतात एक़

उस्मानाबाद : एकिकडे तेलंगणाचे सरकार शेतकर्‍यांना २४ तास वीज मोफत देत आहे़ असे असताना भाजप-सेनेचे सरकार मात्र वसुलीचा तगादा लावून शेतकर्‍यांची वीज तोडत आहे़ यापुढे शेतकर्‍यांची वीज तोडाल तर महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी उस्मानाबादेतून दिला़ 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या मराठवाड्यातील दुसर्‍या टप्प्यास तुळजापुरातून सुरुवात झाली़ यानंतर उस्मानाबाद शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खा.सुप्रिया सुळे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, डॉ.पद्मसिंह पाटील, जयदत्त क्षीरसागर, प्रवक्ते नवाब मलिक, राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहूल मोटे, विक्रम काळे, जि़.प. अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चना पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ, विद्या चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती़ 

यावेळी अजित पवार म्हणाले, भाजप-सेनेचे सरकार फसवे सरकार आहे़ ते बोलतात एक अन् करतात एक़ सत्तेवर येण्यापूर्वी मोठ-मोठी आश्वासने दिली होती़ पण त्यांची पूर्तता केली नाही़ ‘लबाड लांडगं ढोंग करतंय, लोकांना फसविण्याचे काम करतंय’, अशा शब्दात सरकारची खिल्ली उडविली़ समाजांचे आरक्षण, नोटबंदी, शाळा मूठभर लोकांच्या हाती देण्याचा डाव, कर्जमाफी अशा विविध मुद्यांवरुनही अजित पवारांनी सरकारवर टीकेची तोफ डागली़

धनंजय मुंडे म्हणाले, सध्या केंद्र सरकारकडून जाहिराती केल्या जात आहेत़ म्हणे ‘देश बदल रहा है’़ देश बदलतोय की नाही ठाऊक नाही; पण सरकारविरोधी ही जनता पाहिल्यानंतर महाराष्ट्र नक्कीच बदलतोय़ औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत ३५ निर्णय झाले होते़ त्यापैकी दहा निर्णयावरही अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगत हे सरकार महाठग असल्याची टीका मुंडे यांनी केली़ 

कोरेगाव-भीमामागे मनुवादी वृत्ती

भाजप-सेनेचे सरकार काम करण्याऐवजी जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करीत आहे़ कोरेगाव-भीमा प्रकरणातील मास्टरमार्इंड कोण? याचा शोध घेण्याची वेळ आली आहे़ या घटनेमागे मनुवादी वृत्तींचा हात असल्याचा दावा अजित पवार यांनी केला़

भाजपला गाजर, सेनेला मुळा़

भाजप-सेनेचे सरकार नुसती आश्वासनांची गाजरे लोकांना दाखवीत आहे़ काम काहीच करीत नाहीत़ त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला गाजर तर सेनेला मुळा हे निवडणूक चिन्ह देण्यात यावे, अशी उपहासात्मक मागणी अजित पवारांनी केली़

तुळजाईच्या दरबारात ‘गोंधळ’

मराठवाड्यातील आंदोलनाची सुरुवात तुळजापुरातून करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुळजाभवानी मातेच्या महाद्वारावरच ‘जागरण गोंधळ’ मांडला़ यानंतर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ यावेळी सरकारच्या कारभारावर नेत्यांनी सडकून टीका केली़ 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे