शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक, व्यापाऱ्यांत पसरली दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:39 IST

वाशी : शहरासह तालुक्यात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या चोऱ्या ...

वाशी : शहरासह तालुक्यात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या चोऱ्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी व्यापारी संघटनेने बुधवारी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.

शहरामध्ये मागील एक वर्षाहून अधिक कालावधीपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. ज्यामध्ये घरफोडी करून शस्त्राने नागरिकांना जखमी करण्याबरोबरच मुख्य बाजारपेठेमधील व्यावसायिकांची दुकाने फोडली जात आहेत. यातच मागील वर्षभरात एकाही घटनेचा तपास लागलेला नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. रविवारीदेखील मुख्य बाजारपेठेचा हिस्सा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील किराणा दुकान फोडून हजारो रुपयांचे खाद्यतेल चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे नगरपंचायतीने शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून रस्त्यावरील तसेच नागरी वस्त्यांमधील सातत्याने बंद राहत असलेले पथदिवे तत्काळ बदलून ते कायम चालू राहतील अशी व्यवस्था करावी. शहरातील मुख्य रस्ते, चोररस्ते, मुख्य बाजारपेठ चौक या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.

वाशी हे तालुक्याचे ठिकाण असूनदेखील शहरात येण्यासाठी एकही रस्ता सुस्थितीत नाही. यामुळे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दळणवळण होऊ शकत नाही. शिवाय, एस.टी.सारखी शासकीय वाहनेदेखील शहरात येण्याचे टाळतात. त्यामुळे आपल्या अधिकारातून सर्व रस्तेदुरुस्ती करावी, अशी मागणी नगरपंचायतीकडे करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मागील घटनांचा तपास लावून भविष्यातील घटना रोखण्यासाठी गस्त वाढविण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व नगरपंचायतीच्या वतीने अधीक्षक गोपीनाथ घुले यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी वाशी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मुकुंद शिंगणापुरे, उपाध्यक्ष सूर्यकांत मोळवणे, सचिव ॲड. प्रवीण पवार, व्यापारी बंडू भाळवणे, आदी उपस्थित होते. निवेदनावर खालेक पटवेकर, बाळासाहेब उंदरे, शिवशंकर चौधरी, सुंदर नन्नवरे, अशोक टेकाळे, सतीश जगताप, रमेश वीर, गुरुलिंग नगरे, शिवशंकर होळकर, राजेंद्र शेटे, अमित येवारे, अभिमान माने, मनीष कोळी यांच्यासह शहरातील व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.