शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यासाठी आता ग्राहकमंचाकडे शेतकऱ्यांची धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST

सन २०२० मधील खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग पीक काढणीला आले असतानाच, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी ...

सन २०२० मधील खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग पीक काढणीला आले असतानाच, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेले पीक वाया गेले. नैसर्गिक संकटात पिके गेली, तरी जास्त आर्थिक झळ सोसावी लागू नये, यासाठी तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. अतिवृष्टी झाल्याने पीकविमा मिळणे अपेक्षित होते, परंतु विमा कंपनीने या वर्षीपासून पिकाचे नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत कंपनीला ऑनलाइन तक्रार द्यायची, तरच विमा मिळणार, या नियमाचा दाखला देऊन विमा नाकारला. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड फोन नाही. फोन आहेत, त्यांच्याकडे ॲप नाही. बहुतांश जणांना ऑनलाइन तक्रार ही बाबच माहिती नाही. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीच्या अटीमुळे शेतकऱ्यांना यंदा विमा मिळालेला नाही. ही अट शिथिल करून नुकसान भरपाई म्हणून विमा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यावरही कोणतीच कार्यवाही झाली नाही. या निवेदनाची ना प्रशासनाने दखल घेतली ना विमा कंपनीने. त्यामुळे अतिवृष्टीचा फटका बसलेले तालुक्यातील उमरा येथील शेतकरी प्रवीण जाधव यांनी शेतकऱ्यांना विमा मिळावा, यासाठी थेट ग्राहक न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. त्यांनी तालुकाभरातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, यासाठी सर्वच पातळीवर पाठपुरावा चालू केला आहे.

चौकट...

गावोगावी जाऊन जनजागरण करणार : प्रवीण जाधव

अतिवृष्टीमुळे माझ्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले. पिके संरक्षित राहावीत, यासाठी शेतकरी विमा काढतो. यंदा विमा कंपन्यानी अटी दाखवून विमा नाकारला. याबाबत आम्ही थेट मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून विमा मिळवून द्यायची विनंती केली, पण तो मिळाला नाही. आता ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे. गावोगावी जाऊन विमा भरलेल्या पावत्या गोळा करणार आहोत. त्या सर्व शेतकऱ्यांना विमा द्यावाच लागेल, तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे.