शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक पाहणीच्या हायटेक प्रणालीमुळे शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:40 IST

कळंब : पीक पाहणीत अचूकता यावी, त्यात शेतकऱ्यांचा सहभाग रहावा या उद्देशाने ‘ई पीक पाहणी’ हा उपक्रम हाती ...

कळंब : पीक पाहणीत अचूकता यावी, त्यात शेतकऱ्यांचा सहभाग रहावा या उद्देशाने ‘ई पीक पाहणी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी एकीकडे तलाठी शेतकऱ्यांकडे अट्टाहास ठरत असले तरी संबंधित हायटेक प्रणाली मात्र ‘प्रॉपर’ काम करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ई-पीक पाहणीचा प्रयोग सध्या तरी ‘रात्र थोडी, सोंगे फार’ या उक्तीप्रमाणे दिसून येत आहे.

जमीनधारक शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचा व वहिवाटीचा दाखला असलेल्या सातबारा उताऱ्यावरील ‘नमुना नंबर १२’ वर खरीप हंगामातील पिकांची नोंद घेतली जाते. आजवर हे काम गावपातळीवरचे तलाठी करत असत. मात्र, इतर कामाचा व्याप वाढलेल्या तलाठी साहेबांवरील हा ‘लोड’ कमी करून यात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ‘ई पीक पाहणी’ हा नवा हायटेक प्रयोग समोर आला. पीक पाहणीत अचूकता, पारदर्शकता व शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असावा, या उद्देशाची जोड देत यासंबंधीच्या कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला गेला. यानुसार आगामी १५ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये खरीप हंगामात उभ्या असलेल्या पिकांची नोंद अक्षांश अन् रेखांशातील छायाचित्रासह करणे बंधनकारक केले आहे.

यासाठी स्मार्ट मोबाईलवर एक ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, मागच्या आठ दिवसांत ना यासाठी शेतकरी पुढाकार घेत आहेत, ना पुढाकार घेतलेल्या शेतकऱ्यांचा अन् यासाठी कार्यान्वित केलेल्या ॲपचा ताळमेळ लागत आहे. यामुळे एकीकडे वरिष्ठ गावपातळीवरच्या तलाठी यांना आकडा वाढला पाहिजे यासाठी आग्रह करत आहेत तर तलाठी शेतकऱ्यांकडे ‘ई पीक पाहणी कराच’ असा अट्टाहास करत असताना हजारो शेतकरी यापासून दूरच आहेत.

चौकट...

शेतकरी ६४ हजार, ई पीक पाहणी आठ हजारांवर

कळंब तालुक्यात एकूण ६४ हजार शेतकरी आहेत. यापैकी मागच्या दहा दिवसात केवळ आठ हजारांवर शेतकऱ्यांनीच ई-पीक पाहणी केली आहे. यासाठीही तलाठी यांना शेतकऱ्यांकडे मोठी विनवणी करावी लागली आहे. त्यात कळंब मंडळात १ हजार ४९, ईटकूर १ हजार २१, मस्सा २ हजार ८८, येरमाळा ८५५, शिराढोण ९८७, नायगाव ८९९, मोहा १ हजार १५१, गोविंदपूर १ हजार २०५ याप्रमाणे शेतकऱ्यांनी गुरुवारपर्यंत ई पीक पाहणी केली आहे.

रात्र थोडी, सोंगे फार...

ई पीक पाहणी उपक्रमांतर्गत पिकाची माहिती अपलोड करण्यासाठी अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. यास ५ दिवसांचा कालावधी उरला आहे. असे असताना पन्नास हजार शेतकरी यापासून दूर आहेत. यामुळे हा उपक्रम ‘रात्र थोडी, सोंगे फार’ ठरत आहे. यास्थितीत बाबासाहेब कोठावळे, भिमा हगारे, राम कोठावळे, अशोस जगताप, आकाश वाघमारे, मनोज शिंदे, सौरभ मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन यास मुदतवाढ देण्याची मागणीदेखील केली आहे.