शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पिकाला पाणी देताना साप चावल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST

भाऊ पांडा पाटील असे दगावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची पिंपळा (बु.) शिवारात तामलवाडी साठवण तलावाच्या काठावर अडीच एकर जमीन ...

भाऊ पांडा पाटील असे दगावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची पिंपळा (बु.) शिवारात तामलवाडी साठवण तलावाच्या काठावर अडीच एकर जमीन आहे. महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक वाया जाऊ लागले हाेते. त्यामुळे शनिवारी सकाळी ७ वाजता सोयाबीन पिकास पाणी देण्यासाठी गेलेल्या भाऊ पांडा पाटील यास विषारी सापाने दंश केला असता ते बेशुद्ध पडले. दरम्यान, घटनेची माहिती कळताच नातेवाइकांनी वाहनातून उपचारासाठी नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. भाऊ पाटील यांच्या पार्थिवावर पिंपळा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत शेतकऱ्याच्या पश्चात दाेन मुले, दाेन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणी तामलवाडी पाेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. तपास व्ही. एस. भाेसले हे करीत आहेत.

चाैकट...

आजवर तिघांचा सर्प दंशाने मृत्यू

सोयाबीन पिकात खुरपणी, पाणी देणे आदी मशागतीची कामे करताना काटी येथील नागनाथ सोनवणे, पिंपळा (बु.) येथील भाऊ पांडा पाटील, तर काटी येथील सोनाबाई विठ्ठल क्षीरसागर या तिघांचा विषारी साप चावल्याने मृत्यू झाला आहे. तसेच सांगवी (काटी) येथे राधा रवि मगर, तर काटी येथील शामल किसन हंगरकर या दोन महिलांना सर्प दंशामुळे जखमी झाल्या. यंदा सापांचा वावर सोयाबीनसह उडीद, मूग आदी पिकांत अधिक आहे. परिणामी सर्प दंशाच्या घटना वाढल्या आहेत.