चोवीस तास कामात व्यस्त रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:30 IST2021-02-14T04:30:14+5:302021-02-14T04:30:14+5:30
भूम : प्रत्यकाने पाण्याचा वापर काटकसरीने करावा. सांडपाणी शोषखड्ड्याच्या माध्यमातून जमिनीत जिरवावे, असे आवाहन करून चोवीस तास कामात व्यस्त ...

चोवीस तास कामात व्यस्त रहा
भूम : प्रत्यकाने पाण्याचा वापर काटकसरीने करावा. सांडपाणी शोषखड्ड्याच्या माध्यमातून जमिनीत जिरवावे, असे आवाहन करून चोवीस तास कामात व्यस्त रहा, तरच जीवनात यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन पाटोद्याचे सरपंच भास्कर पेरे-पाटील यांनी केले.
येथील शंभूराजे विचारमंचच्या वतीने आयोजित ‘स्मरण आक्काचं’ व्याख्यानमालेत ते बोलत होते. आरोग्य सुधारण्यासाठी स्वच्छ पाणी पिण्याची गरज आहे. त्यामुळे गावकारभाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. आपण जेवण चांगले असावे, असा आग्रह धरतो. त्याचप्रमाणे स्वच्छ पाण्यासाठीदेखील आग्रही राहिले पाहिजे. चांगले कर्म करा, स्वच्छता राखा, शौचालय बांधा, चांगले शिक्षण घ्या, अरोग्य जपा व आपल आयुष्य वाढवा, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षस्थानी नगर परिषद गट नेते संजय गाढवे, तर उद्घाटक म्हणून परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे सीई होते. यावेळी शंभुराजे युवामंचच्या वतीने शहरातील व्यावसायिक अजित जाधव, महावीर साबळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गट नेते संजय गाढवे यांनी स्वच्छेतेबाबत नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करणे गरजेचे असल्याचे सांगून भूमकरांसाठी लवकरच सर्व सोईंनी युक्त रुग्णालय उभारण्यात येत असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन प्रा. राम चंदनशिवे, प्रस्ताविक नागेश डोंगरे यांनी केले. अभार रणजित साळुंके यांनी मानले.