शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पुजारी, व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

तुळजापूर : दुसऱ्या लाटेत कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी ...

तुळजापूर : दुसऱ्या लाटेत कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले. यामुळे मंदिरावर अवलंबून असलेले जवळपास साडेसातशे छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक व दोन-अडीच हजार पुजाऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडले असून, मंदिर उघडून व्यवसाय करू द्या, अशी मागणी पुजारी, व्यापाऱ्यांमधून होत आहे.

मार्च-२०२० मध्ये कोरोनाचे संक्रमण वाढल्याने श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. ते तब्बल आठ ते नऊ महिने बंद राहिले. यामुळे शहरातील जवळपास अडीच हजार पुजाऱ्यांसह हळद-कुंकू, फूल, हार, ओटी, नारळ, पेढा, खेळणी, मूर्ती विक्रेते, हॉटेल, लॉजमालक आदी व्यावसायिकांसह मंदिरावर अवलंबून असलेले जवळपास ७५० ते ८०० व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने दिवाळी-पाडव्याच्या मुहूर्तावर प्रशासनाने नियम, अटी लादून भाविकांसाठी मंदिर खुले केले. यानंतर विस्कटलेली आर्थिक घडी बसत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा एप्रिल २०२१ मध्ये प्रशासनाने शासनाच्या पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. व्यापारी, व्यावसायिक, पुजारी पुन्हा आर्थिक संकटात सापडले.

दरम्यान, मागील आठवड्यात ज्या जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, त्या ठिकाणी पाच टप्प्यांमध्ये सर्व व्यवसाय, व्यवहार वेळेची बंधने घालून व कोरोनाचे नियम लावून खुले केले आहेत. मात्र, भाविकांसाठी बंद असलेल्या मंदिराचा प्रश्न मात्र अनुत्तरित असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या पुजारी, व्यापारी, व्यावसायिकांची अडचण कायम आहे.

कोट..........

आम्ही देवीच्या मूर्ती आणि पूजा साहित्याचे दुकान चालवून कुटुंबाची उपजीविका भागवितो; मात्र, कोरोनामुळे पहिल्या टप्प्यात ८ महिने मंदिर बंद होते. यामुळे व्यवसायही ठप्प झाल्याने कुटुंबाचे अतोनात हाल झाले. त्यानंतर काही दिवस मंदिर खुले केल्यामुळे व्यवसाय मूळ पदावर येत होता. परंतु, दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा भाविकांसाठी मंदिर बंद केल्याने व्यवसाय बंद झाला. यामुळे आर्थिक अडचणीत भर पडली आहे. शहरातील ८० टक्के नागरिक देवीच्या मंदिरावर अवलंबून आहेत. मंदिर उघडत नसल्याने आमच्यावर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असे पत्रही मी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

- संजय बोंदर, व्यापारी