शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : मोठ्या आशेने पेरलेल्या रबी पिकांकडूनही निराशा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 12:14 IST

दुष्काळवाडा : रबीची पेरणी केली़ मात्र, उगवणच झाली नाही़ तूरही जळून जात आहे़ त्यामुळे लोहाऱ्यातील शेतकरी चिंतातुर झाले आहेत़ 

- बालाजी बिराजदार, लोहारा खुर्द, ता़ लोहारा, जि़ उस्मानाबादलोहारा शहरापासून चार कि.मी.अंतरावरील लोहारा खुर्दचे अख्खे शिवार पावसावरच अवलंबून आहे़ सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी दोन टप्प्यात पेरणी केली. पण, नंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने खरिपातून पेरणीचा खर्चही निघाला नाही. यानंतरही वरुणराजा बरसेल, या आशेवर रबीची पेरणी केली़ मात्र, उगवणच झाली नाही़ तूरही जळून जात आहे़ त्यामुळे लोहाऱ्यातील शेतकरी चिंतातुर झाले आहेत़ 

१५४६ लोकसंख्येच्या लोहारा खुर्द गावचे अर्थकारणच शेतीवर आहे. त्यात दर दोन ते तीन वर्षाला अवर्षणाचा फेरा सुरू आहे़ त्यामुळे कर्जातून सावरण्याची संधीच येथील शेतकऱ्यांना मिळेना झाली़ यावर्षी पुन्हा दुष्काळ पडला़ खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग, तूर ही पिके घेतली होती़ मात्र, पावसाने दोन वेळा दीर्घ खंड दिल्यामुळे अगदी पेरणीचाही खर्च खरिपातून निघालेला नाही़ सरासरीच्या अवघे ४० टक्केही उत्पन्न मिळाले नाही़ तरीही पुन्हा कर्ज काढून वरुणराजाच्या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी रबीची पेरणी केली़ मात्र, पाऊस गायब झाला अन् काळ्या मातीत पेरलेले बियाणे हरभरा, ज्वारी, करडीचा पेरा अक्षरश: वाया गेला आहे़ कर्जाचे काही तरी होईल, पण पोटापाण्याचे काय, असा मोठा प्रश्न येथील शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे़ त्यात पुन्हा ग्रामपंचायतीच्या सहा बोअरपैकी दोनच बोअर सुरू आहेत. तर आठ हातपंप केव्हाच बंद पडले आहेत. पाण्यासाठीही आतापासूनच भटकंती सुरू झाली़ हे चित्र आगामी काळातील दाहकता दर्शवीत आहे़ 

रबीची आशाच नाही लोहारा तालुक्यात खरिपाच्या उत्पन्नात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली असून, पाऊस नसल्याने रबी हंगामाची अजिबात आशा उरली नाही़ त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे़ - मिलिंद बिडबाग,     तालुका कृषी अधिकारी 

बळीराजा काय म्हणतो?

- साडेचार एक शेतीत सोयाबीन दोन बॅग व तूर पेरली़ सोयाबीनला पेरणी, खुरपणी व काढणीसाठी सरासरी वीस हजार रुपये खर्च आला, पण उत्पन्न मात्र तेरा हजार रुपयांचे निघाले आहे़ तुरीला आता फुलं आली आहेत. पण, पाऊस नसल्याचे ती गळून पडताहेत़ रान मोकळं कसं ठेवायचं म्हणून हरभरा पेरला तोही आता उगवला नाही़ - रुपाबाई आरगडे 

- माझ्या पाच एकर शेतीत एक हेक्टरमध्ये सोयाबीन घेतले होते़ एकूण खर्च वीस हजार व उत्पन्न सोळा हजार रुपयांचे झाले़ मेहनत तर वायाच गेली़ खर्चही निघाला नाही़ रबीवर आशा ठेवून ओल नसतानाही हरभरा पेरला़ त्याची उगवणच झाली नाही. आमची शेती पूर्णत: पावसावरच अवलंबून असल्याने आता भागवायचे कसे? - व्यंकट रसाळ 

- अवेळी व कमी पडलेल्या पावसामुळे खरिपाचे उत्पन्न ४० टक्के  झाले़ यामुळे आर्थिक गणित पूर्णपणे चुकले. रबीवर आशा होती, पण पाऊस झाला नाही. त्यामुळे रबीचे उत्पन्न काही येत नाही, हे माहीत असतानाही आशेवर दीड एकर ज्वारी पेरली़ बारा दिवस झाले तरी ती उगवली नाही़ त्यामुळे आता करायचे काय, खायचे काय, असा प्रश्न पडला आहे़ - श्रीहरी गाडवे 

- खरिपात सोयाबीन पेरले, पण खर्चही निघाला नाही. तूर पावसाअभावी वाळत चालली़ यामुळे शेतीकडे फिरकण्याचे मनही होईना़ अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे? शासन नुसत्या घोषणा करीत आहे. शेतकऱ्यांच्या पदरी काहीच नाही. यावर्षीची आजची स्थिती पाहता पुढच्या भीषण दुष्काळाची धडकी भरत आहे़ - शेखर पाटील

- माझी शेती साडेपाच एकर आहे़ यात सोयाबीन, उडीद चार एकरावर घेतले़ पण खर्च व उत्पन्नाचा ताळमेळच बसला नाही़ अंगावरील कर्ज कायम राहिले़ रबीची थोडीफार आशा होती. हरभरा पेरला होता़ आता सात दिवस उलटले तरी तो उगवलाच नाही़ अशा परिस्थितीत आम्ही करायचे तरी काय, हेच सुचेनासे झाले आहे़ - रवींद्र रसाळ 

टॅग्स :droughtदुष्काळAgriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेतीMarathwadaमराठवाडाRainपाऊस