शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

धीर सोडू नका, सरकार आपल्या पाठीशी आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:36 IST

कळंब : तालुक्यातील मांजरा नदीच्या तीरावर वसलेल्या गावात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेती अन् शेतकरी संकटात आहे. याठिकाणी ...

कळंब : तालुक्यातील मांजरा नदीच्या तीरावर वसलेल्या गावात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेती अन् शेतकरी संकटात आहे. याठिकाणी भेट देत आ. कैलास पाटील यांनी ‘घाबरू नका, सरकार आपल्या पाठीशी आहे’, असे म्हणत शेतकऱ्यांना धीर दिला.

बहुला येथून मांजरा नदी तालुक्यात प्रवेशित होते. या नदीच्या तीरावर पुढे आढळा, खोंदला, सात्रा, भाटसांगवी, कळंब, आथर्डी आदी गावांचा शिवार येतो. मागच्या पाच दिवसांपासून मांजरा नदीला पूर आलेला आहे. यामुळे उपरोक्त गावातील नदीकाठचे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके मांजराच्या पाण्याने आपल्या कवेत घेतले आहेत. इतर शिवारातही पाणीच पाणी झाले आहे. उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.

दरम्यान, आ. कैलास पाटील यांनी रविवारी तालुक्यातील बहुला, आढळा, सात्रा, खोंदला, आडसूळवाडी, भाटसांगवी आदी मांजरा पट्ट्यातील गावांना भेटी देत पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांची उपस्थिती होती. यावेळी ‘धीर सोडू नका, सरकार आपल्या पाठीशी आहे. पंचनामा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. विम्याचा वैयक्तिक क्लेम सादर करावा’, असे सांगत आ. पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.