शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात विद्यार्थ्यांविना ५० टक्के गुरुजींचीच भरतेय शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : जिल्हा तिसऱ्या स्टेपमध्ये हाेता. त्यामुळे काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आलेले नाही. त्यामुळे ...

उस्मानाबाद : जिल्हा तिसऱ्या स्टेपमध्ये हाेता. त्यामुळे काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आलेले नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी शाळांवरील गुरुजींची उपस्थिती पन्नास टक्केच राहील, असे जिल्हा प्रशासनाकडून नमूद करण्यात आले हाेते. या पत्राला अनुसरूनच शिक्षण विभागानेही पत्र काढले हाेते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शाळेतील गुरुजींची उपस्थिती पन्नास टक्केच आहे. परिणामी अन्य जिल्ह्यांप्रमाणे वेळेवरून उडालेल्या गाेंधळाला थारा मिळू शकला नाही.

राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. काही जिल्ह्यांत शिक्षकांच्या उपस्थितीबाबत दाेन पत्रके निघाली. शिक्षण संचालकांनी ५० टक्के उपस्थितीचे फर्मान साेडले, तर जिल्हा परिषदांनी ५० टक्के उपस्थितीचे पत्र काढले. या दाेन पत्रांमुळे शिक्षकांमध्ये पुरता गाेंधळ उडाला. शाळेवर नेमक्या किती टक्के शिक्षकांनी उपस्थित राहायचे, असा प्रश्न शिक्षक एक दुसऱ्याला विचारत हाेते. दरम्यान, उस्मानाबादेत काेराेना रुग्णसंख्या अपेक्षित प्रमाणात कमी झालेली नव्हती. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या पहिल्याऐवजी थेट तिसऱ्या टप्प्यात उस्मानाबादचा समावेश झाला. परिणामी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध प्रशासनाला उठविता आले नाहीत. निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यात आले. या आदेशातच जिल्हा प्रशासनाने शाळांतील शिक्षकांची उपस्थिती पन्नास टक्के निश्चित केली हाेती. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने पत्र काढले हाेते. दरम्यान, दाेन पत्रांवरून राज्यभरात गाेंधळ उडाल्यानंतर शासनाने ५० टक्के उपस्थिती निश्चित केली. यानंतर उस्मानाबाद जिल्हा परिषदेनेही दुसरे पत्र काढले. त्यामुळे अन्य जिल्ह्यांप्रमाणे उस्मानाबादेत शिक्षक उपस्थितीच्या प्रमाणावरून गाेंधळ उडाला नाही.

चाैकट...

शिक्षण विभागाने शाळा सुरू हाेण्यापूर्वी पत्र काढले हाेते. ते पत्रही ५० टक्के उपस्थितीच्या अनुषंगाने हाेते. शासनाने स्वतंत्र पत्र काढून ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य केली. त्यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीवरून आपल्याकडे गाेंधळ उडण्याचा प्रश्नच आला नाही. आपल्याकडील सर्व शाळांतून सध्या विद्यार्थ्यांना ॲप तसेच ऑनलाइन पद्धतीने ज्ञानदान करण्यात येत आहे.

-गजानन सुसर, शिक्षणाधिकारी.

दाेन्ही पत्रके ५० टक्के उपस्थितीचीच...

काेराेनाचा संसर्ग फारसा ओसरला नसल्याने शिक्षण विभागाने शाळा सुरू हाेण्यापूर्वीच पत्र काढून शाळेवर शिक्षकांची ५० टक्केच उपस्थिती निश्चित केली हाेती. राज्यातील काही जिल्ह्यांत मात्र शिक्षण संचालकांनी ५० टक्के उपस्थिती तर जिल्हा परिषदांनी तब्बल १०० टक्के उपस्थित राहण्याचे फर्मान गुरुजींना काढले हाेते. त्यामुळे गाेंधळाचे वातावरण निर्माण झाले हाेते. शासनाच्या पत्रकानंतर हा गाेंधळ निवळला. मात्र, उस्मानाबादेत दाेन्ही पत्रे ५० टक्के उपस्थितीची असल्याने अन्य जिल्ह्यांप्रमाणे गाेंधळ उडाला नाही.

रिकामे बाकडे अन् गुरुजींची हजेरी

१५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परंतु, काेराेनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास मनाई आहे. मात्र, ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक केली आहे. संबंधित शिक्षकांनी शाळेवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने ज्ञानदान करण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा किलबिल ऐकावयास येत नाही. सध्या केवळ रिकामे बाकडे आणि शिक्षकांची हजेरी एवढेच चित्र पहावयास मिळत आहे.

शिक्षक

१३,९७८

शिक्षकेतर कर्मचारी

१७००

जिल्ह्यातील शाळा

१५३३

जिल्हा परिषद शाळा

१०८३

अनुदानित शाळा

३९०

विनाअनुदानित शाळा

१३

स्वंयअर्थसहाय्यित शाळा

८०