शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकली मुले घरात राहून कंटाळली, पहिली ते चौथीची शाळा वर्षभर थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:30 IST

उस्मानाबाद : काेरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे इयत्ता पहिली ते चौथीचे २०१९-२० चे शैक्षणिक सत्रदेखील अद्याप सुरू झोलेले नाही. यामुळे ...

उस्मानाबाद : काेरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे इयत्ता पहिली ते चौथीचे २०१९-२० चे शैक्षणिक सत्रदेखील अद्याप सुरू झोलेले नाही. यामुळे तब्बल ११ महिन्यांपासून मुले घरातच बंदिस्त झाली आहेत. त्यातील काही सुटीमुळे मजेत असली तरी अनेक जण घरात कंटाळली असून, त्यांना शाळा हवी आहे. मात्र, त्यासाठी पालकांची ना असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या संकटातून काही अंशी दिलासा मिळाल्यानंतर आणि लॉकडाऊन शासनाने शिथिलता दिल्यानंतर आधी नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीच्या सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अद्याप इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली नाही. दरम्यान, जी मुले मुळातच शिक्षणात हुशार आहेत. ती आता घरी राहून कंटाळली आहेत. त्यांना पूर्वीप्रमाणे पुन्हा शाळेत जायचे आहे. त्यामुळे आता पहिली ते चौथीच्या मुलांना शाळा सुरू होण्याची आशा आहे.

प्रतिक्रिया...

मागच्या वर्षी शाळेत जात होतो. तेव्हा मजा येत होती; पण आता खूप दिवसांपासून मी घरातच आहे. घरी राहून खूप कंटाळा आला आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होतात, त्याचीच वाट पाहत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मी शाळेत जाणार आहे.

शंकर शेळके, विद्यार्थी वर्ग ४ थी

सर्वांच्याच शाळा सुरू झाल्या आहेत. आमचीच शाळा बंद आहे. खूप दिवस झाले घरातच बसून राहावे लागत आहे. शाळा सुरू होणे गरजेचे आहे.

अनुष्का फुटाणे, विद्यार्थिनी, वर्ग २ री

आमचे सर मोबाइलवर अभ्यासक्रम पाठवितात. तो आम्ही सोडवून घेतो. शाळेत शिकविल्याप्रमाणे मोबाइलवर पाठविलेले अभ्यास समजत नाही. त्यामुळे शाळा सुरू व्हायल्या पाहिजेत.

संबोधी वाघमारे, विद्यार्थिनी, वर्ग ३ री

शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन अभ्यास घेत आहेत. घरी बसूनही अभ्यास होत आहे. त्यामुळे या वर्षी शाळा सुरू करू नये.

विराज मगर, विद्यार्थी, इयत्ता २ री

ऑनलाइनच शिक्षण चालू ठेवावे, लहान मुले असल्याने शाळेत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खबरदारी घेतली जाईल, याची खात्री नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत शासनाने घाई करू नये.

भीमराव पाटील, पालक

मुले घरी राहून कंटाळली आहेत. ऑनलाइन शिक्षणापेक्षा ऑफलाइन शिक्षण महत्त्वाचे असल्याने शाळा सुरू व्हायल्या पाहिजेत. शाळा सुरू झाल्यानंतर मैदानी खेळ घेणे टाळावेत.

डॉ. मकरंद बाराते, पालक

काेरोनाचे रुग्ण संख्या कमी होत असली तरी अद्यापही कोरोनाचे संकट टळलेले नाही. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पहिली ते चौथी शाळा बंदच असणे गरजचे आहे. शाळा सुरू करण्याबाबत शासनाने रिस्क घेऊ नये.

मिलिंद कुलकर्णी, पालक