शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
3
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
4
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
5
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
6
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
7
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
8
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
9
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
10
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
11
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
12
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
13
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
14
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
15
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
16
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
17
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
18
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
19
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
20
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा पट्टा सावरत नाही तोच तेरणा पट्ट्यात ढगफुटीची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST

कळंब : ऐन काढणी हंगामात पावसाचे ‘कमबॅक’ झाल्याने तालुक्यातील खरीप हंगामाचे आतोनात नुकसान झाले. गुरुवारी रात्री मांजरा तर शुक्रवारी ...

कळंब : ऐन काढणी हंगामात पावसाचे ‘कमबॅक’ झाल्याने तालुक्यातील खरीप हंगामाचे आतोनात नुकसान झाले. गुरुवारी रात्री मांजरा तर शुक्रवारी मध्यरात्री तेरणा पात्रात पावसाने कहर केला. हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे फड पाण्यात तरंगत आहेत. नदीकाठच्या उभ्या पिकातून पाणी वाहत असून, तर इतर ठिकाणच्या क्षेत्रावर ‘चिबड’ लागले आहे. कुठे घराची पडझड तर कुठे रस्ते बंद झाले होते. यासंबंधी ‘लोकमत’ने घेतलेला हा ग्राऊंड रिपोर्ट.

मंगळवार, बुधवार व गुरुवार असा सलग तीन दिवस मांजरा नदीच्या पट्ट्यात पाऊस झाला. यातच लगतच्या बीड, केज, वाशी, भूम व पाटोदा या मांजराच्या पाणलोट क्षेत्र असलेल्या तालुक्यात पाऊस झाल्याने मांजरामाय पोटोपोट वाहू लागली. यातच धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बॅकवॉटरला पाण्याचा फुगवटा निर्माण झाला. यामुळे मांजरा नदीच्या तिरावरील बहुला, आढळा, सात्रा, खोंदला, भाटसांगवी, कळंब, खडकी या शिवारातील नदीकाठच्या जमिनीतील उभी पिके पाण्याखाली गेली. याशिवाय बॅकवॉटरच्या लोहटा पूर्व, पश्चिम, करंजकल्ला, हिंगणगाव, कोथळा, खडकी, कळंब, दाभा येथील शेतीस फटका बसला. लाभक्षेत्रातील आवाड शिरपुरा येथे तर शेकडो एकर उसाच्या फडातून पाणी वाहत होते. जुन्या व नव्या गावाचा पुलावरील पाण्यामुळे संपर्क तुटला होता.

यापाठोपाठ येरमाळा भागात शुक्रवारी रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली. पुढे तीन तास मोठा पाऊस झाला. या पावसाची तब्बल १०२ मिलिमीटर एवढी नोंद झाली. या वर्षातील या भागातील हा सर्वात मोठा पाऊस होता. यामुळे तेरणा नदीला मोठा पूर आला होता. हा पाऊस येरमाळ्यासह तेरणाकाठच्या मोहा, मस्सा महसूल मंडळातील गावातही बरसला आहे.

दरम्यान, मांजरा, तेरणा नदीकाठच्या भागासह तालुक्यातील इटकूर, मोहा, शिराढोण, खामसवाडी, गोविंदपूर, नाय, वाठवडा भागातही पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे फड पाण्यात गेले आहेत. गावोगावी शेतकरी प्रशासनाला मदतीची साद घालत आहेत.

तलाठी, कृषी सहायकांचा नाही पत्ता..

मांजरा काठावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतानाही नुकसान पाहण्यास तलाठी व कृषी सहायक काही गावात फिरकले नसल्याचे चित्र आहे. बहुला येथेही तलाठी आले नव्हते. या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ईटकूर येथे प्रशिक्षणार्थी तहसीलदार रोहण शिंदे, तलाठी प्रवीण पालखे यांनी पाहणी केली.

केलेले कष्ट अतिवृष्टीत स्वाहा...

येरमाळा, रत्नापूर, शेलगाव दिवाने, शेलगाव (ज), संजितपूर, सापनाई, दहिफळ, गौर, सातेफळ, सौंदना, एरंडगाव आदी सर्व गावात पावसाने कहर केला. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे फड पाण्यात गेले. कष्टाने पिकवलेले पिवळे सोने पाण्यात मातीमोल झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना शनिवारी घास गोड लागला नाही. कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणारी ही अपरिमित हानी डोळ्याने बघवणारी नव्हती.