शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! जेवण वाढायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीला संपवलं; मृतदेहापाशीच बसून राहिला अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 09:29 IST

शेतावरून काम करून आल्यानंतर जेवण मिळायला थोडा उशीर झाला, या कारणावरून संतापलेल्या एका नराधम पतीने आपल्या पत्नीला संपवले!

भूक माणसाचा विवेक हरपून टाकते, याचा प्रत्यय देणारी एक थरारक घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून समोर आली आहे. शेतावरून काम करून आल्यानंतर जेवण मिळायला थोडा उशीर झाला, या कारणावरून संतापलेल्या एका नराधम पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात फावड्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण देवापूर गाव हादरून गेले असून कौटुंबिक वादाचा असा रक्तरंजित अंत पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

नेमकं काय घडलं?

मुरादाबादच्या कटघर कोतवाली क्षेत्रातील देवापूर गावात राजू सैनी नावाचा तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. गुरुवारी संध्याकाळी राजू शेतातील काम आटोपून घरी परतला. कष्टाचे काम करून आल्यामुळे तो खूप भुकेलेला होता. घरी येताच त्याने पत्नी पूनम हिच्याकडे जेवणाची मागणी केली. पूनम घराच्या कामात व्यस्त असल्यामुळे जेवण तयार व्हायला थोडा उशीर झाला होता. याच शुल्लक कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली.

रागाच्या भरात विवेक हरपला

भांडण इतके विकोपाला गेले की, संतापलेल्या राजूने समोर पडलेले फावडे उचलले आणि पूनमवर हल्ला चढवला. त्याने पूनमच्या डोक्यावर एक-दोनदा नव्हे, तर तब्बल तीन वेळा फावड्याने जोरदार वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, पूनम रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

हत्येनंतर मृतदेहाशेजारीच बसून राहिला!

या घटनेनंतर आरोपी राजू तिथून पळून गेला नाही. गुरांच्या गोठ्यात आपल्या पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना, तो शांतपणे तिथेच बसून राहिला. घरातील विखुरलेले अन्न आणि रक्ताचे डाग तिथल्या क्रूरतेची साक्ष देत होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तिथे धाव घेतली आणि पोलिसांना कळवले.

मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

माहिती मिळताच कटघर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी राजू सैनीला तात्काळ ताब्यात घेतले आहे. मृताच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आपल्या वडिलांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दाम्पत्यामध्ये किरकोळ कारणावरून खटके उडत होते, अशी माहितीही समोर आली आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया

"संध्याकाळी पाचच्या सुमारास कौटुंबिक वादातून हत्येची माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोहोचल्यावर आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुराव्यांची जुळवाजुळव सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे," असे पोलीस अधीक्षक कुमार रणविजय सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारUttar Pradeshउत्तर प्रदेश