शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 6:52 PM

जेव्हा ड्युटीवर तैनात असलेल्या शिपाई गुरपिंदर सिंग यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.

ठळक मुद्दे जेणेकरून हे पाणी पिऊन तेथील शिपाई, अन्य कर्मचारी आणि रुग्णांचा मृत्यू होईल, असा कट त्याने आखला.गुरपिंदर हे कृष्णा कॉलनीमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये कर्तव्यावर कार्यरत होते.ज्यावेळी पोलीस शिपाई गुरपिंदर सिंग पाणी पिण्यासाठी तेथे आले तेव्हा टाकीतून वेगळाच वास येत होता.

लुधियाना - भावाला अटक केल्याने एका तरूणाने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने बस्ती जोधेवालच्या कृ्ष्णा कॉलनी परिसरातील एका क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विषजन्य पदार्थ मिसळला. जेणेकरून हे पाणी पिऊन तेथील शिपाई, अन्य कर्मचारी आणि रुग्णांचा मृत्यू होईल, असा कट त्याने आखला.जेव्हा ड्युटीवर तैनात असलेल्या शिपाई गुरपिंदर सिंग यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. बस्ती जोधेवाल पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शिपाई असलेल्या गुरपिंदर सिंग यांच्या तक्रारीवरून कृ्ष्णा कॉलनी येथे राहणारा वरिंदर उर्फ नितीका खुंसी आणि चूहड़पुर गावात राहणार त्याचा साथीदार गौरव आणि त्याची बहीण सिमरनविरुद्ध हत्येचा कट रचल्याप्रकरणात अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी याप्रकरणात आरोपीला अटक केली आहे. आरोपींना बुधवारी न्यायालयात सादर करण्यात आले. येथून या तिघांनाही एक दिवसाचा पोलीस रिमांड मिळाला आहे. पोलीस आरोपींकडे चौकशी करत आहेत. तपास अधिकारी एएसआय राधेश्याम यांनी सांगितले की, आरोपी वरिंदरचा भाऊ जतिंदर सिंग यांच्या विरोधात लुटमारी आणि लुटमारीचा कट रचणे यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी आरोपी जतिंदरला याआधी अटक केली होती. यावेळी या तपास पथकात शिपाई गुरपिंदर सिंग यांचा समावेश होता. त्याचा बदला घेण्यासाठी जतिंदरचा भाऊ वरिंदर याने गुरपिंदरविरोधात कट रचला. गुरपिंदर हे कृष्णा कॉलनीमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये कर्तव्यावर कार्यरत होते. त्यामुळे त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याची हत्या करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने क्वारंटाईन सेंटरमधील दाखल असलेल्या रुग्णांनाही सोडणार नाही असे ठरवले आणि पाण्याच्या टाकीत विषजन्य पदार्थ मिसळला. ज्यावेळी पोलीस शिपाई गुरपिंदर सिंग पाणी पिण्यासाठी तेथे आले तेव्हा टाकीतून वेगळाच वास येत होता. त्या वासामुळे त्यांची तब्येत बिघडू लागली. यावेळी सोबतच्या कर्मचाऱ्यांना सांगितले तेव्हा कळाले आरोपी छतावर होते. यावेळी तपासादरम्यान आरोपींनी बदला घेण्यासाठी म्हणून या पाण्याच्या टाकीत विषारी पदार्थ मिसळला असल्याचं समोर आले. एएसआय राधेश्याम यांनी आरोपींना न्यायालयात सादर केल्यानंतर पोलिस रिमांडमध्ये पाठवण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून कसून चौकशी केली जात आहे, अशी माहिती दिली. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

 

संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जयमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह 

टॅग्स :PoliceपोलिसPunjabपंजाबArrestअटक