शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
4
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
5
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
6
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
7
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
8
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
9
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
10
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
11
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
13
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
14
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
15
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
16
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
17
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
18
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
19
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
20
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड विकास दुबेच्या साथीदारांना उत्तर प्रदेशात विमानाने नेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 03:54 IST

सध्याचे कोविडचे वातावरण आणि मुंबई ते कानपूर हा १४०० किलोमीटरचा पल्ला लक्षात घेता या दोघांनाही विमानाने नेण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली होती.

ठाणे : उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबेचे साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फगुड्डन रामविलास त्रिवेदी आणि सुशीलकुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी या दोघांचा ट्रान्झिट रिमांड ठाणे न्यायालयाने सोमवारी मंजूर केला. त्यानंतर या दोघांचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांच्या पथकाकडे देण्यात आला. या दोघांनाही मंगळवारी मुंबईहून कानपूर येथे विमानाने घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्याचे कोविडचे वातावरण आणि मुंबई ते कानपूर हा १४०० किलोमीटरचा पल्ला लक्षात घेता या दोघांनाही विमानाने नेण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली होती.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलिसांच्या हत्याकांडात विकास दुबे हा मोस्ट वॉन्टेड होता. त्याचा चकमकीत खात्मा झाल्यानंतर त्याचे काही साथीदार फरार झाले होते. ठाण्याच्या कोलशेत भागातून मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाने त्यांच्यापैकीच अरविंद आणि सुशील या दोघांना अटक केली. या दोघांनाही १२ जुलै रोजी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायाधीश रश्मी झा यांनी त्यांना २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्यांची रवानगी तळोजा (नवी मुंबई) कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, या दोघा आरोपींचा ताबा मिळविण्यासाठी कानपूर (उत्तर प्रदेश) पोलिसांच्या एका निरीक्षकासह तिघांचे पथक सोमवारी ठाण्यात पोहोचले. या पथकाने या दोघांच्याही ट्रान्झिट रिमांडची मागणी केली. या वेळी आरोपीचे वकील अनिल जाधव यांनी दोघांचा ताबा यूपी पोलिसांना देण्यात येऊ नये; तसेच अरविंद हा फक्त संशयित असल्यामुळे त्याची जामिनावर मुक्तता करावी, अशी मागणी केली. या दोन्ही मागण्या फेटाळून लावत ठाणे सत्र न्यायालयाने कानपूर पोलिसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. दोघा आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात यावे; तसेच त्यांचा चौकशी अहवाल ठाणे न्यायालयात सादर करावा, असे निर्देशदेखील या वेळी न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना दिले.

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबे