शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

भिवंडीतून पाच वर्षांपूर्वी अपहृत झालेली मुलगी मिळाली ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 9:28 PM

मर्जीनेच लग्न केल्याचा दावा : गुजरातमधून आली होती नातलगांना भेटायला

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: पाच वर्षांपूर्वी भिवंडीतून अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या कक्षाला सोमवारी दुपारी यश आले. मर्जीनेच १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह केल्याचाही दावा तिने चौकशीमध्ये पोलिसांकडे केला.

भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात २८ फेब्रुवारी २०१७ रोजी तत्कालीन १७ वर्षांच्या या मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. ९ मार्च २०२१ रोजी म्हणजे पाच वर्षांनी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविले होते. हाच तपास १८ जून २०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग झाला. दरम्यान, हीच मुलगी ठाण्यातील मासुंदा तलाव येथे काही कामानिमित्त येणार असल्याची टीप पोलीस उपनिरीक्षक भगवान औटी यांना मिळाली. त्या आधारे १८ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका लहान बाळासह मासुंदा तलाव परिसरात ती उभी असताना या पथकाने तिला ताब्यात घेतले. तेव्हा गुजरात येथून ठाण्यातील नातेवाइकांना भेटायला आल्याचे तिने सांगितले.

सध्या ती २२ वर्षांची असून, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर गुजरात येथील एका तरुणाबरोबर मर्जीने विवाह केला. तिला सध्या तीन वर्षांचा मुलगाही असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची खातरजमा करून तिला तिच्या पतीच्या ताब्यात दिल्याचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी