शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 12:00 IST

जमिनीच्या वादातून गुंडांनी पाच वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपींनी लहान मुलाचा मृतदेह त्याच्या आईला दिला.

बिहारमधील बेगुसराय येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून गुंडांनी पाच वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपींनी लहान मुलाचा मृतदेह त्याच्या आईला दिला आणि म्हणाला, "हे बघ, तुझा मुलगा मेला." घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

मुलगा बिस्किट आणण्यासाठी गेलेला दुकानात

बेगुसरायच्या रिफायनरी पोलीस स्टेशन परिसरातील चकबल्ली गावातील वॉर्ड क्रमांक १४ मध्ये ही घटना घडली आहे. मुलाच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गोलू घरातून १० रुपये घेऊन जवळच्या दुकानातून बिस्किट खरेदी करण्यासाठी गेला होता. शेजारी राहणाऱ्या बाळकृष्ण सिंहच्या कुटुंबीयांनी त्याची धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी चकबल्ली गावाचा रस्ता रोखून गोंधळ घातला. 

जमिनीवरून सुरू होता वाद 

हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मुलाच्या कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण सिंहच्या कुटुंबासोबत जमिनीवरून बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. यासंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. आरोपी अनेकदा तुमच्या मुलाला मारून टाकेन अशी धमकी देत ​​असत. 

"हे बघ, तुझा मुलगा मेला"

मुलाीची आई रिंकू देवी यांनी आरोप केला आहे की, गोलू घरातून पैसे घेऊन बाहेर गेला होता. बिस्किट खरेदी करण्यासाठी १० रुपये नेले होते. थोड्या वेळाने, बाळकृष्ण सिंहच्या कुटुंबातील एक महिला गोलूचा मृतदेह घेऊन आली आणि हे बघ, तुझा मुलगा मेला असं म्हणाली. आरोपीने गोलूच्या डोक्यात खिळा ठोकून त्याची हत्या केली. सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBiharबिहार