शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
3
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
4
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
5
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
6
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
7
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
8
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
9
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
10
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
11
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
12
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
13
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
14
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
15
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
16
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
17
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
18
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
19
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
20
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:12 IST

एका २८ वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. महिलेने पतीला जेवणात झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात दिल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

आसाममधील कछार जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका २८ वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने पतीला जेवणात झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात दिल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी कबरीमधून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

निवडणुकीतील विजयानंतर घडली घटनाया घटनेतील मृताचं नाव इमरान हुसैन बरभुइया (३८) असं आहे. ते नुकतेच ग्रामपंचायत निवडणूक जिंकून राजनगर-खुलीछडा पंचायतचे अध्यक्ष झाले होते. ११ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि कुटुंबीयांनी तो हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १२ ऑगस्टला मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मात्र, मृताचा भाऊ नजीब बरभुइया यांना काही संशय आला. त्यांनी २० ऑगस्टला ढोलाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला.

अवैध संबंध आणि हत्येचं कटकारस्थानढोलाई पोलीस ठाण्याचे प्रभारी कुलेंद्र हुझुरी यांनी सांगितलं की, मृतदेह सिलचर मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सिलचर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मृताची पत्नी रीना बेगम (२८) आणि बशीर-उज्जमान लष्कर उर्फ बिजू (३३) यांना अटक केली आहे. बिजू हा इमरानच्या गाडीचा चालक होता.

मृताचा भाऊ नजीब यांनी आरोप केला आहे की, रीना आणि बिजू यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. ११ ऑगस्टच्या रात्री बिजूने झोपेच्या गोळ्या आणल्या, ज्या रीनाने इमरानच्या जेवणात मिसळल्या. इमरानचा घरीच मृत्यू झाला.

नजीब सांगतात की, त्यावेळी रीनाने इमरानचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं, पण चार दिवसांनंतरच तिने संपत्तीत वाटा मागितला, त्यामुळे त्यांचा संशय अधिक वाढला.

व्हॉट्सॲप चॅटमधून कट उघडनजीब आणि त्यांच्या मित्रांनी या प्रकरणाची गुपचूप चौकशी केली असता, रीना आणि बिजू यांच्यात झालेल्या व्हॉट्सॲप चॅटमधील संभाषण समोर आलं. एका चॅटमध्ये रीनाने लिहिलं होतं की, 'आतापर्यंत मृतदेह सडून गेला असेल, काळजी करू नकोस.' या मेसेजमुळे हत्येचं कटकारस्थान आणि परदेशात पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन उघड झाला. पोलिसांनी जेव्हा बिजूची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने सर्व सत्य सांगितलं.

गावकऱ्यांमध्ये संतापया घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी बिजू आणि तीन लोकांना मारहाण केली. त्यांची गाडीही फोडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून त्यांची सुटका केली आणि त्यांना ताब्यात घेतलं.

सोमवारी सुमारे ५०० गावकऱ्यांनी ढोलाई पोलीस ठाण्यासमोर रोड जाम केला. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्याची आणि कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांच्या आश्वासनानंतरच गावकरी शांत झाले.

नजीब यांनी सांगितलं की, हत्येमागचं मुख्य कारण ६० लाख रुपये होतं. इमरानने जमीन खरेदी करण्यासाठी ही रक्कम घरी ठेवली होती. ही माहिती रीनाने बिजूला दिली आणि मग दोघांनी मिळून हत्येचा कट रचला. गावकऱ्यांनीही सांगितलं की, इमरानला पत्नी आणि चालकाच्या संबंधांवर संशय होता. इमरानने बिजूला कामावरून काढूनही टाकलं होतं, पण बिजूच्या आईच्या विनंतीमुळे त्यांनी त्याला पुन्हा कामावर ठेवलं. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार