शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

Lakhimpur Tragedy: लखीमपूरमध्ये वातावरण बिघडले; दंग्यामध्ये ८ जणांचा मृत्यू; योगींनी सर्व कार्यक्रम रद्द केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 22:01 IST

UP's Lakhimpur Kheri: माझा मुलगा तिथे उपस्थित नव्हता. तो तिथे असता तर जिवंत परत आला नसता. हल्लेखोरांकडे काठ्या, तलवारी होत्या. त्यांनी लोकांना ठार मारले. आमच्याकडे व्हिडीओ आहेत, असा आरोप केंद्रीय राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांनी केला. 

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीचे खासदार आणि गृह राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा मोनू मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चढविल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यानंतर उसळलेल्या राड्यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून मंत्री टेनी यांनी आपला मुलगा तिथे उपस्थित नव्हता असे सांगितले आहे. (eight dead after Union minister's son allegedly runs car over protesting farmers in UP's Lakhimpur Kheri)

 उप मुख्यमंत्री केशव मोर्य यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी तिकोनिया येथे जमले होते. त्यांच्यावर गाडी आदळण्यात आली आहे. मोर्य हे टेनी यांच्या मुळ गावी योजनांच्या उद्घाटनासाठी जात होते. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चढविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. संतप्त शेतकऱ्यांनी टेनी यांच्या मुलाच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या तीन गाड्या पेटवून दिल्या होत्या. 

हे प्रकरण आता तापले असून योगी आदित्यनाथांनी आपले दौरे रद्द केले आहेत. तसेच आरपीएच्या तीन तुकड्या तिकडे पाठविल्या आहेत. टेनी यांनी एएनआयला सांगितले की, भाजपाचे कार्यकर्ते आंदोलक शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी गेले होते. तेव्हा शेतकऱ्यांतील काही समाजंटकांनी कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. यामुळे कार चालविणाऱ्या चालकाला दुखापत झाली. यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि दोन जण कारखाली आल्याने मृत झाले. यानंतर आमच्या तीन कार्यकर्त्यांचा देखील मृत्यू झाला. कारना देखील आग लावण्यात आली. (Lakhimpur Kheri: 'My Driver, 3 BJP Workers Were Killed. It’s a Conspiracy', Says MoS Home Ajay Mishra)

माझा मुलगा तिथे उपस्थित नव्हता. तो तिथे असता तर जिवंत परत आला नसता. हल्लेखोरांकडे काठ्या, तलवारी होत्या. त्यांनी लोकांना ठार मारले. आमच्याकडे व्हिडीओ आहेत, असा आरोप मंत्री अजय मिश्र टेनी यांनी केला. 

 

दरम्यान, शेतकऱी संघटनेचे नेते राकेश टिकैत हे दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले आंदोलन सोडून लखीमपूरला निघाले आहेत. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी देखील उद्या तिथे जाणार आहेत. तसेच सपाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आता भाजपा कार्यकर्ते फिरू शकणार नाहीत असा इशारा दिला आहे. यामुळे उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर तेथील वातावरण तापले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशFarmerशेतकरीBJPभाजपा