शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

Lakhimpur Tragedy: लखीमपूरमध्ये वातावरण बिघडले; दंग्यामध्ये ८ जणांचा मृत्यू; योगींनी सर्व कार्यक्रम रद्द केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 22:01 IST

UP's Lakhimpur Kheri: माझा मुलगा तिथे उपस्थित नव्हता. तो तिथे असता तर जिवंत परत आला नसता. हल्लेखोरांकडे काठ्या, तलवारी होत्या. त्यांनी लोकांना ठार मारले. आमच्याकडे व्हिडीओ आहेत, असा आरोप केंद्रीय राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांनी केला. 

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीचे खासदार आणि गृह राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा मोनू मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चढविल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यानंतर उसळलेल्या राड्यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून मंत्री टेनी यांनी आपला मुलगा तिथे उपस्थित नव्हता असे सांगितले आहे. (eight dead after Union minister's son allegedly runs car over protesting farmers in UP's Lakhimpur Kheri)

 उप मुख्यमंत्री केशव मोर्य यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी तिकोनिया येथे जमले होते. त्यांच्यावर गाडी आदळण्यात आली आहे. मोर्य हे टेनी यांच्या मुळ गावी योजनांच्या उद्घाटनासाठी जात होते. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चढविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. संतप्त शेतकऱ्यांनी टेनी यांच्या मुलाच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या तीन गाड्या पेटवून दिल्या होत्या. 

हे प्रकरण आता तापले असून योगी आदित्यनाथांनी आपले दौरे रद्द केले आहेत. तसेच आरपीएच्या तीन तुकड्या तिकडे पाठविल्या आहेत. टेनी यांनी एएनआयला सांगितले की, भाजपाचे कार्यकर्ते आंदोलक शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी गेले होते. तेव्हा शेतकऱ्यांतील काही समाजंटकांनी कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. यामुळे कार चालविणाऱ्या चालकाला दुखापत झाली. यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि दोन जण कारखाली आल्याने मृत झाले. यानंतर आमच्या तीन कार्यकर्त्यांचा देखील मृत्यू झाला. कारना देखील आग लावण्यात आली. (Lakhimpur Kheri: 'My Driver, 3 BJP Workers Were Killed. It’s a Conspiracy', Says MoS Home Ajay Mishra)

माझा मुलगा तिथे उपस्थित नव्हता. तो तिथे असता तर जिवंत परत आला नसता. हल्लेखोरांकडे काठ्या, तलवारी होत्या. त्यांनी लोकांना ठार मारले. आमच्याकडे व्हिडीओ आहेत, असा आरोप मंत्री अजय मिश्र टेनी यांनी केला. 

 

दरम्यान, शेतकऱी संघटनेचे नेते राकेश टिकैत हे दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले आंदोलन सोडून लखीमपूरला निघाले आहेत. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी देखील उद्या तिथे जाणार आहेत. तसेच सपाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आता भाजपा कार्यकर्ते फिरू शकणार नाहीत असा इशारा दिला आहे. यामुळे उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर तेथील वातावरण तापले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशFarmerशेतकरीBJPभाजपा