शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त ११ शेतकरी कुटुंब पात्र

By admin | Updated: September 15, 2014 00:19 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना तातडीची मदत मिळावी याकरिता एकूण १७ प्रकरणे समितीसमोर ठेवण्यात आली. त्यापैकी ११ प्रकरणे पात्र ठरली. चार प्रकरणे अपात्र तर दोन प्रकरणे

वर्धा : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना तातडीची मदत मिळावी याकरिता एकूण १७ प्रकरणे समितीसमोर ठेवण्यात आली. त्यापैकी ११ प्रकरणे पात्र ठरली. चार प्रकरणे अपात्र तर दोन प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आल्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना तातडीची मदत मिळावी यासाठी जिल्हास्तरी बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.सेलू तालुक्यात घोराड येथील मृतक महादेव गेंदालाल वरटकर, आकोली येथील मंगेश आंबटकर, वडगाव येथील लक्ष्मण कुमरे, तळोदी येथील लक्ष्मण बावणे, जुवाडी येथील सिद्धार्थ धवने, देवळी तालुक्यातील तांबा येथील संदेश रामदास वाघाडे, लोणी येथील मधुकर धारकर, कवठा (रेल्वे) येथील पुरणदास गायकवाड, आंजी (ब.) येथील प्रफुल्ल भोयर, टाकळी येथील पंढरी ठाकरे, बोरगाव (आ.) येथील विश्वनाथ टिपले या मृतकांच्या वारसदारांना तातडीची मदत देण्यात समितीने पात्र ठरविले आहे. देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील किसना डडमल आणि गौळ येथील अतुल भोयर या मृतकांची प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. अपात्र प्रकरणांमध्ये आर्वी तालुक्यातील सायखेडा येथील शांताबाई ठाकरे, किन्हाळा येथील रघुनाथ पडधाम, आष्टी तालुक्यातील काकडदरा येथील सुरेश गुळभेले आणि देवळी तालुक्यातील कोल्हापूर (सि.) येथील मंगेश ठवळे या मृतकांची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत, असेही अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)