शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

झिंगणाऱ्यांना ना ‘हृदया’ची काळजी, ना ‘विंचवाचा’ डंख

By admin | Updated: July 29, 2014 01:09 IST

उस्मानाबाद : दारू आणि तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची शासनासह विविध सामाजिक संघटनांकडून जनजागृती करण्यात येत आहे़

उस्मानाबाद : दारू आणि तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची शासनासह विविध सामाजिक संघटनांकडून जनजागृती करण्यात येत आहे़ असे असले तरी युवक, मजुरांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असून, त्यांना ना ‘ह्दया’ची काळजी ना ‘विंचवा’च्या डंखाची तमा आहे़शेतात कामाला जाणारा मजूर असो अथवा महाविद्यालयीन शिक्षण घेणारे युवक असोत किंवा शासकीय, निमशासकीय कार्यालयात कार्यरत अधिकारी, कर्मचारी असोत यात अनेकांना दारूसह तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात जडले आहे़ शहरातच नव्हे ग्रामीण भागाच्या गल्लीबोळात, चौकाचौकात मोठ्या प्रमाणात पानटपऱ्यांसह दारूची दुकाने थाटण्यात आली आहेत़ हातभट्टी, गावठी दारू सहजपणे उपलब्ध होत आहे़ पोलिसी कारवाईचीही सवय लागलेल्यांना याची कोणतीच तमा राहिलेली नाही़ शाळा महाविद्यालयाच्या आवारातील १०० मीटरवर पानटपरीसह इतर तंबाखू, आम्लीपदार्थ विक्री करण्यास मनाई आहे़ मात्र, तरीही या परिसरात नव्हे शाळा-महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्येच सिगारेटांचे धूर सुटू लागले आहेत़ या धुराचा सिगारेट ओढणाऱ्याला त्रास होतोच, शिवाय निर्व्यसनी युवकांनाही याचा त्रास होत असल्याचे दिसून येते़ शिवाय अनेक शिक्षकांनाही सिगारेटसह सुपारीचा छंद असल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई होणार कशी ? असा प्रश्न आहे़ तंबाखू, सिगारेटसह दारूच्या बाटल्यांवरही होणाऱ्या दुष्परिणामांच्या सूचना दिलेल्या आहेत़ तंबाखूवर विंचवाचे चित्र दाखवून तंबाखू खाणे शरीरासाठी विषाप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले आहे़ मात्र, तरीही आम्लीपदार्थांचे सेवन राजरोस सुरू असल्याचे भीषण चित्र समाजात आहे़तंबाखूचे दुष्परिणामतंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेटमुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, किडनीचा किंवा मूत्राशयाचा कॅन्सर (कर्करोग) होवू शकतो़ ५६़४ टक्के स्त्रियांना व ४४़९ टक्के पुरूषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे समोर आले आहे़ ९० टक्क्यांपेक्षा अधिक फुफ्फुसाचा आणि इतर कॅन्सर हा धुम्रपानामुळे होत असल्याचा निष्कर्ष आहे़मानसिक स्वास्थ्य बिघडतेदारूसह इतर आम्ली पदार्थामुळे संबंधितांचे मानसिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणात बिघडून जाते़ दारूमुळे मेंदूवरील नियंत्रण सुटल्याने गुन्हेगारी कृत्यासह समाजविघातक कृत्यही संबंधितांच्या हातून घडू शकते़ शिवाय संशयी वृत्ती, नैराश्य वाढल्याने कुटुंबातही कलह निर्माण होतात, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ महेश कानडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)वर्षभरात केला सात लाखांचा मुद्देमाल जप्त येथील अन्न व सुरक्षा विभागाचे आयुक्त पारधी, अन्न सुरक्षा अधिकारी लोंढे, एऩटी़मुजावर यांच्या पथकाने एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीत जिल्ह्यात ठिकठिकाणी गुटखा विक्रेत्यांसह तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरूध्द कारवाई करून तब्बल ५ लाख, ४ हजार ५९१ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता़ तर चालू वर्षी जुलै अखेरपर्यंत केलेल्या विविध कारवाईत एक लाख, ९३ हजार ६७१ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होऊनही अवैधरीत्या गुटखाविक्री जोमात सुरू आहे़दारूचे दुष्परिणामदारूमुळे जठरात दहा व सूज येणे, यकृतावर दुष्परिणाम झाल्याने भूक मंदावणे, अशक्तपणा येणे, कावीळ, पोटात पाणी, स्वादुपिंडाला आजार, स्नायूंचा कमकुवतपणा, मेंदी आणि ह्दयावरील वाईट परिणाम आदीमुळे दुष्परिणाम होतात़ अतिदारू प्राशनामुळे बेशुध्द झालेल्यांचा मृत्यूही होऊ शकतो़ शिवाय याचे सामाजिक परिणामही मोठे होतात़ दारू पिणाऱ्या पुरूषांसह महिलांनाही वरील अजार जडतात़सामाजिक दुष्परिणामदारू पिऊन रस्त्याने झिंगणारे ठिकठिकाणी दिसून येतात़ त्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबाची सामाजिक, आर्थिक हानी मोठी होते़ शिवाय भांडण-तंटेही मोठ्या प्रमाणात उद्भवतात, समाजातही तेढ निर्माण होण्याचा धोका संभवतो़ अनेकांचे संसार दारूमुळे उध्दवस्त झाल्याची हजारो उदाहरणे समाजासमोर आहेत़सामाजिक प्रयत्न गरजेचेअवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्यांसह दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस प्रशासन कारवाई करते़ यापुढेही पोलिसांकडून कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे़ मात्र, हा प्रश्न सहजासहजी मिटणारा नाही, त्या व्यक्तींमध्ये निर्माण झालेला वाईट गुण काढण्यासाठी सामाजिक प्रयत्न गरजेचे आहेत़ देशाचे भविष्य असलेली युवापिढीही व्यसनाच्या आहारी जात आहे़ त्यामुळे पालकांसह त्या व्यक्तीच्या कुटुंबातील प्रत्येकाने त्याचे व्यसन सुटण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले़