शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याचा शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:28 IST

मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री म्हणाले : आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, आपण आता समृद्धी देण्याचे काम करू

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिला.७० व्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभ येथे हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. मराठवाड्याच्या मागासलेपणाबद्दल मुख्यमंत्री बोलले मात्र त्यांनी मागीलवर्षी मुक्तिसंग्राम दिनानिमित्त केलेले भाषण आणि यंदाचे भाषण यामध्ये जवळपास साधर्म्य होते.मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वजांनी मराठवाड्याला स्वातंत्र्य दिले आता मराठवाड्याला समृद्धी व विकास देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. औरंगाबाद शहराच्या विकासासाठी निधीची उपलब्धता करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, परिवहनमंत्री दिवाकर रावते, खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, आ. सतीश चव्हाण, आ. प्रशांत बंब, आ. विनायक मेटे यांची उपस्थिती होती.१७ सप्टेंबर २०१७ रोजीचेमुख्यमंत्र्यांचे भाषणमराठवाड्याच्या हक्काचे पाणी कृष्णा खोऱ्यातून मिळविण्यासाठी, केंद्र शासनाच्या माध्यमातून दमणगंगा प्रकल्पाचे ५० टक्के टीएमसी पाणी गोदावरी खोºयात आणण्यासाठी तत्त्वत: मान्यता मिळाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार, १७ सप्टेंबर २०१७ रोजी मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी आयोजित कार्यक्रमात सांगितले होते.केंद्र शासनााने प्रस्ताव मंजूर करताच मराठवाड्याला दमणगंगेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. मराठवाड्यातील सिंचन वाढावे, यासाठी धरणांच्या कामांना चालना देण्यात येत आहे.पाणी प्रश्न सोडविण्यासाठी वॉटरग्रीड प्रकल्पाचा आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. या ग्रीडमुळे मराठवाड्यातील उद्योग तसेच शेतीला मोठा फायदा होईल.डीएमआयसीतील आॅरिकसिटीमुळे सुमारे ३ लाखांपर्यंत रोजगारनिर्मिती होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे साडेचार लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. आता संघर्ष विकासासाठी करायचा आहे. गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवाद, कर्जमुक्तीसाठी सरकार प्रयत्नशील आहे.१७ सप्टेंबर २०१८ रोजीमुख्यमंत्र्यांनी केलेले भाषणमराठवाड्याला विकासाची भूक आहे. याला मागासलेपणापासून मुक्ती हवी आहे. त्यासाठी या सरकारने चार वर्षांत या भागासाठी विविध निर्णय घेतले. सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कारवाई केली. नांमका प्रकल्पासह मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मान्यता दिली. बळीराजा संजीवनी योजनेच्या माध्यमातून मराठवाड्याला १५ हजार कोटींपेक्षा जास्त निधी दिला.जलयुक्त शिवार योजनेत मोठे काम विभागात केले. पथदर्शी हे काम असून, राज्यात ३५ टक्के शेततळे मराठवाड्यात झाले. ६० हजार हेक्टर सिंचन त्यातून झाले.डीएमआयसीसारखी केंद्र सरकारची योजना आहे. योजनेतील आॅरिक सिटीचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आहे. दुसºया टप्प्यात ११ हजार कोटींची गुंतवणूक होईल. येथील ३ लाख लोकांना रोजगार मिळेल. वॉटरग्रीड देशातील मोठा ग्रीड प्रकल्प असेल. त्यामध्ये मोठी गुंतवणूक केली जाणार आहे.१४ प्रकल्पांचे पाणी ग्रीडमध्ये एकत्रित केले जाईल. शेती, सिंचन, पिण्यासाठी आणि उद्योगांसाठी दिले जाणार आहे. आधुनिक असे हे ग्रीड असणार आहे. नागपूर-मुंबई सुपर एक्स्पे्रस मार्गाचे काम सरकार करीत आहे. औरंगाबाद-जालना ही शहरे मराठवाड्याच्या उद्योगाचे मॅग्नेट म्हणून काम करतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस