शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोली गावाला वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: June 1, 2014 00:26 IST

उमरगा शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील चिंचोली (जहांगीर) येथे झालेल्या वादळी पावसाने सुमारे तासभर झोडपले.

उमरगा शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील चिंचोली (जहांगीर) येथे झालेल्या वादळी पावसाने सुमारे तासभर झोडपले. यात अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने ग्रामस्थांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली. यानंतर रात्री उशिरापर्यंत उडून रानोमाळ विखुरलेली पत्रे गोळा करण्यासाठी गावकर्‍यांची धावपळ सुरू होती. दरम्यान, विद्युत खांब, डीपीही उन्मळून पडल्यामुळे गावचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे. या वादळी वार्‍याने शिवारातील लिंब, बाभळ, आंबा, चिंच, बोर आदी शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. यात सतीश ममाळे, तानाजी काळे, विनायक काळे, श्रीधर बोंडगे, प्रल्हास घोसले, रमेश बोंडगे आदी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. शिवाय सुग्रीव ब्याळे, उल्हास पाटील यांनी प्रक्रियेसाठी ठेवलेल्या हळद पिकात पाणी गेल्याने त्यांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. सुहास पाटील, भास्कर शिंदे, रमेश बेंडगे या शेतकर्‍यांच्या शेतातील ऊस पिकालाही या वादळी पावसाचा जबर फटका बसला. शेतकर्‍यांनी जनावरांसाठी शेतात कडब्याच्या गंजी लावून ठेवल्या होत्या. या वादळी वार्‍याने हा कडबाही रानोमाळ विस्कटून गेला. यामुळे पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. प्रल्हाद भोसले घोसले या शेतकर्‍याच्या जनावरांचा कोठा वादळी वार्‍याने उडून जावून आत ठेवलेले खते, बियाणे पाण्याचे भिजून नुकसान झाले. या वादळी पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. पडझड झालेल्या ग्रामस्थांचे संसार शनिवारी दिवसभर उघड्यावर असल्याचे दिसून आले. तसेच भितीपोटी या ग्रामस्थांनी शुक्रवारची रात्रही जागून काढली. एकूणच झालेल्या पडझडीमुळे या गावातील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्युत खांब उन्मळून पडल्याने या गावातील वीजपुरवठा खंडित झाला असून, यामुळे पिण्याचे पाणी, दळण-कांडपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूणच झालेल्या या पडझडीमुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तहसीलदार उत्तमराव सबनीस यांनी या भागातील तलाठी डी. टी. पवार व मंडळ अधिकारी विजयकुमार पाटील यांना आदेश दिल्याप्रमाणे तलाठी पवार यांनी शनिवारी गावातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे. भरपाईची मागणी झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने करण्यात यावी, अशी मागणी सरपंच विजयाताई पाटील, सुहास पाटील, पं. स. सदस्य भास्कर शिंदे, उपसरपंच शाम घोसले, व्यंकट ममाळे, रमेश बोंडगे, राजेंद्र ममाळे, ज्ञानेश्वर काळे, उत्तमबाई जाधव, अनिता शिंदे, पद्मीनबाई गुरव, पार्वतीबाई कांबळे, सुवर्णा ब्याळे, शालीवाहन पाटील आदींनी केली आहे. (वार्ताहर) ग्रामपंचायत वार्‍यावर चिंचोली (ज) येथील ग्रामपंचायत इमारतीचे नव्यानेच बांधकाम करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळच्या वादळी वार्‍यात या कार्यालयावरील पत्रे उडून गेल्याने कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, फर्निचर भिजून मोठे नुकसान झाले. शनिवारी दिवसभर वार्‍याने झालेल्या नुकसानीची पाहणी सरपंच विजयाताई पाटील, उपसरपंच श्याम घोसले यांच्यासह सदस्यांकडून सुरू होती. ग्रामपंचायत शेजारी वास्तव्यास असलेल्या सतीश ममाळे यांच्या घरावर झाड उन्मळून पडल्याने या कुटुंबालाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. अंगणवाडीची पडझड चिंचोली येथील १७४ क्रमांकाच्या अंगणवाडीवरील संपूर्ण पत्रे उडून गेल्याने अंगणवाडीतील तांदूळ, गहू, डाळी, वॉटर फिल्टर, गॅस शेगडी आदी साहित्याचे नुकसान झाल्याचे दिसून आले. निर्मला सूर्यवंशी या कार्यकर्तीने संबंधितांकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. डीपी उन्मळून पडली गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नव्याने उभारण्यात आलेला श्रीधर बेंडगे यांच्या शेतीजवळील विद्युत डीपी या वादळामुळे उन्मळून पडली. शिवाय या डीपीला जोडण्यात आलेले व इतर पन्नास ते साठ खांबही कोसळले असल्याने विजेच्या तारा जमिनीवर लोंबकाळत आहेत. शिवाय गेल्या चोवीस तासांपासून गावातील वीज पुरवठाही खंडित झाला आहे. यांना लागला मुका मार वादळी वार्‍यात घरांच्या झालेल्या पडझडीत गावातील विनायक काळे, प्रकाश काळे, संगीता काळे, शोभा काळे, तर गोठ्यावरील पत्रे उडाल्याने श्रीधर बोंडगे यांच्या शेतात काम करणारे शेतगडी अशोक अहिरे हे लोक जखमी झाले. अनेक पशुधनांनाही मुका मार लागल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.