शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरणाची पाणीपातळी तळास

By admin | Updated: June 22, 2014 00:03 IST

माजलगाव: येथील धरणातील पाणीपातळी चार टक्क्यांपेक्षा खाली गेली आहे. यामुळे धरणातील पाणी पिण्यासह परळी येथील औद्योगिभ केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

माजलगाव: येथील धरणातील पाणीपातळी चार टक्क्यांपेक्षा खाली गेली आहे. यामुळे धरणातील पाणी पिण्यासह परळी येथील औद्योगिभ केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर पश्न निर्माण झाला आहे. माजलगाव धरणाची पाणी साठवण क्षमता ४३१.८० मीटर येवढी आहे. गतवर्षी पाऊस कमी पडल्याने या धरणात केवळ ४२ टक्के पाणीसाठा झाला होता. या धरणातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असते. या धरणामुळे माजलगाव, परळी, धारूर आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बागायती शेती केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनाही धरणामुळे चांगले पाणी असल्याने त्या शेतकऱ्यांनी ऊस शेतीसह भाजीपाला, फळबागाही केलेल्या आहेत. यामुळे या धरणातील पाणीसाठा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. शेतीसह या धरणातील पाण्यामुळे बीड, माजलगावसह परिसरातील अनेक गावांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. धरणातील पाणी आटल्याने आता शेतकऱ्यांसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न भेडसावत आहे. माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्यातून एप्रिल व मे महिन्यात दोन पाणीपाळ्या शेतकऱ्यांसाठी सोडण्यात आल्या होत्या. या दोन्ही पाणी पाळ्यांसाठी ३२.५३७ द.ल.घ.मी. पाणी सोडण्यात आले होते. पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले. अद्यापही धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. गत आठवड्यात सिंदफणा नदीला काही प्रमाणात पाणी आले होते. मात्र, यानंतरही धरणाच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी टंचाई आराखड्यात या धरणातील १०.७९ टक्के पाणी आरक्षित केले आहे. धरणातील १. ०८ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होऊ शकते, असा अंदाज आहे. धरणात सध्ये ३. ८४ द.ल.घ.मी. पाणी आहे. हे पाणी पिण्याच्या पाण्यासह परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी आरक्षित केले आहे, अशी माहिती अभियंता राजेंद्र दहातोंडे यांनी दिली. माजलगाव धरणातील सर्व पाणी आरक्षित केल्याने हे पाणी जोत्याच्या खाली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना यापुढे एकही पाणी मिळू शकणार नाही.मृग नक्षत्र संपूर्ण कोरडे गेल्याने व यापुढे धरणातून पाणी मिळणार नसल्यान ज्या शेतकऱ्यांनी धरणाच्या पाण्यावर ऊस, भाजीपाला व फळबागा केल्या आहेत, त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. खडका धरणात सोडले होते पाणीखडका धरणातून परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रास पाणीपुरवठा केला जातो. खडका धरणातील पाणी दोन महिन्यांपूर्वीच आटले होते. यामुळे परळी येथील विद्युत निर्मिती करणारे काही संच बंद ठेवण्याची वेळ आली होती. येथील सर्वच विद्युत निर्मिती बंद पडू नये, यासाठी माजलगाव धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (वार्ताहर)धरणातील उपसा बंद करणारउपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे म्हणाले की, येत्या काळात पाऊस न झाल्यास पाण्याचे नियोजन आणखी करावे लागेल. जे शेतकरी पाईपलाईन करून धरणातून पाणी उपसा करतात, त्यांचा पाणीउपसाही बंद करणार असल्याचे कांबळे म्हणाले.