शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी गेले खोलच खोल...!

By admin | Updated: April 6, 2016 01:25 IST

औरंगाबाद : जिल्ह्याचे तापमान जसे वाढू लागले आहे, तसा त्याचा परिणाम भूजल पातळीवर होतो आहे.

औरंगाबाद : जिल्ह्याचे तापमान जसे वाढू लागले आहे, तसा त्याचा परिणाम भूजल पातळीवर होतो आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा एप्रिलच्या सुरुवातीस सर्वाधिक भूजल पातळी खोलवर गेल्याची माहिती पुढे आली आहे. पाच वर्षांत दरवर्षी सुमारे १० मीटर या प्रमाणात पाणीपातळी खाली जात आहे. ही बाब गंभीर असल्यामुळे त्याचा परिणाम आगामी काळात जलसंकट घेऊन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे कार्यालय आहे. कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांकडून भूजल सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून घेतले जात आहे. यंत्रणेने तयार केलेल्या अहवालानुसार भूजल खोलवर जात असल्याचे अनुमान लावणे शक्य आहे. परंतु कोणत्या भागात किती पाणी आहे, याचा निश्चित अंदाज लावणे यंत्रणेला शक्य नाही, अशी खंत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जमिनीच्या पृष्ठभागापासून खाली खोल १५० ते २०० फुटांपर्यंत पाणीपातळी गेली आहे. ते उपसण्यासाठीदेखील नागरिक मागे पुढे पाहत नाहीत. केरळ आणि तामिळनाडूतील ‘रॉकब्रेक’ करणाऱ्या बोअरवेल्सच्या ट्रकने शहर व जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भूजल पातळी खोलवर जात असताना विंधन विहिरी घेण्याचा सपाटा सुरू आहे. हातपंप, विंधन विहिरी खोदण्यावर शासनाने निर्बंध आणले आहेत; परंतु मनुष्यबळाची कमतरता आणि शासनाकडून मार्गदर्शन होत नसल्यामुळे जिल्ह्यात भूजलावर डाका टाकण्याचे काम जोरात सुरू आहे.