शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभाखाली वॉल्व्हची गळती

By admin | Updated: August 3, 2014 00:58 IST

मानवत : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाखालच्या वॉल्व्हची गळती झाली आहे. या गळतीने टाकीतील अंदाजे चार लाख लिटर पाण्याची नासाडी झाली.

मानवत : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाखालच्या वॉल्व्हची गळती झाली आहे. या गळतीने टाकीतील अंदाजे चार लाख लिटर पाण्याची नासाडी झाली. कर्मचाऱ्यांच्या गाफीलपणामुळे हा प्रकार २ आॅगस्टच्या पहाटे अडीच्या सुमारास घडला. मानवतला पाणीपुरवठा करणारा जलशुद्धीकरण प्रकल्पावरील जलकुंभ ११ लक्ष लिटरचा आहे. हा जलकुंभ शहरात असणाऱ्या सर्वच जलकुंभापेक्षा उंचीवर आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध झालेले पाणी याच जलकुंभामध्ये साठविल्या जाते आणि त्यानंतर शहरातील इतर जलकुंभामध्ये वितरित करण्यात येते. १ आॅगस्ट रोजी जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध झालेले पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पातील जलकुंभामध्ये साठविण्यात आले. हे पाणी जलकुंभामध्ये सहा मीटर म्हणजे सुमारे ८ लक्ष लिटर एवढे होते. जलकुंंभाखालच्या वॉल्व्हमधून सातत्याने पाणी गळती होत असल्याने नगराध्यक्षांनी जलकुंभाच्या खाली १ आॅगस्ट रोजी १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा नवीन वॉल्व्ह टाकला. परंतु याची फिटिंग योग्य प्रकारे झाली नाही. न.प.च्या पाणीपुरवठा विभागाने या वॉल्व्हची खरे तर जलकुंभात पाणी साठवित असताना चाचणी घेणे गरजेचे होते. परंतु अशी कोणतीही चाचणी पाणीपुरवठा विभागाने घेतली नाही. परिणामी जलकुंभात ८ लक्ष पाणी साठल्यानंतर पाण्याचा दाब वॉलवर पडला आणि नव्यानेच बसविण्यात आलेल्या वॉल्व्हमधून पाईप एक इंच बाजूला सरकला. परिणामी पाणी मोठ्या प्रमाणावर गळती झाले. परंतु याचा अंदाज गाफील कर्मचाऱ्यांना येईपर्यंत सुमारे ४ लाख लिटरपेक्षा अधिक पाणी वाहून गेले होते. जलकुंभावरील कर्मचाऱ्यांना जाग आल्यानंतर उर्वरित पाणी आठवडी बाजारातील जलकुंभात साठविण्यासाठी सोडले. परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. मानवतला पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पावरील जलकुंभ भरण्यासाठी ९ तासाचा अवधी लागतो. सदरील जलकुंभ साधारणपणे ७५ टक्के भरलेला असताना गळतीमुळे रिकामा झाला आणि नागरिकांची तहानही भागली नाही. नागरिक मात्र आपल्याला पाणी येणार, या आशेने नळाकडे पाहतच राहिले. जलकुंभातील पाणी गळती झाल्यानंतर उपनगराध्यक्ष बाबूराव हळनोर, डॉ. अंकुश लाड व इतर नगरसेवकांनी येऊन वॉल्व्हची पाहणी केली आणि तत्काळ वॉल्व्हची दुरुस्ती करून जलकुंभाचे पुनर्रभरण चालू केले. नवीन टाकलेल्या वॉल्व्हची पाणीपुरवठा विभागाने चाचणी घेतली नाही आणि त्याचा परिणाम मात्र शहरवासियांना पाण्याच्या भटकंतीने सहन करावा लागला. (वार्ताहर)पाण्याचा साचला डोह जलकुंभातील पाणी गळती झाल्यानंतर त्याचा वेग एवढा होता की, जलकुंभाच्या बाजूला असणारी माती चक्क वाहून जाऊन तिचा आकार नालीसारखा झाला. तर शासकीय मुलांच्या वसतिगृहाकडे मोठमोठे असणारे खड्डे या पाण्यामुळे तुडुंब भरून जाऊन या परिसराला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. या ठिकाणाहून शासकीय वसतीगृहातील मुले शहरातील शाळा, महाविद्यालयात ये-जा करतात. त्यांचा रस्ता या पाण्यामुळे बंद झालाच शिवाय दिवसा म्हशींंनीही या पाण्यात शिरून स्नाचा आनंद घेतला. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही काळापर्यंत मिटला आहे.