शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे विचार समजून घ्या -बाली

By admin | Updated: March 19, 2016 20:16 IST

हिंगोली : जातपात, भाषा व प्रांत मतभेद विसरून प्रत्येकाने बाबासाहेबांना व संविधानाला समजून घेणे काळाची गरज आहे.

हिंगोली : जातपात, भाषा व प्रांत मतभेद विसरून प्रत्येकाने बाबासाहेबांना व संविधानाला समजून घेणे काळाची गरज आहे. त्याशिवाय देशातील विषमता नष्ट होणार नसल्याचे आॅल इंडिया समता सैनिक दलाचे प्रमुख मार्गदर्शक एल. आर. बाली यांनी शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. बाली यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत काम केलेले असून जवळपास २०० च्यावर विविध पुस्तके लिहिली आहेत. डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाची धुरा आजही वयाच्या ८६ व्या वर्षी बाली न थकता मोठ्या उत्साहाने देशभर फिरून सांभाळत आहेत. बाली म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी स्वत:ला एका ठरावीक प्रांत किंवा जातीची ओळख कधीच दाखविली नाही. ते म्हणत मी प्रथम भारतीय आहे. बाबासाहेबांनी नेहमीच देशभक्तीला प्रथम स्थान दिले आहे. त्यामुळे प्रत्येकानेच देशभक्त असल्याची भावना जपायला हवी. प्रत्येक नागरिकांनी तसेच तरूणाईने बाबासाहेबांचे विचार अंगीकारणे आवश्यक असून त्यांचा वसा जपण्याचे काम करणे आवश्यक आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या समाजाची निर्मितीचे काम व त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. ते म्हणाले, कुठल्याही समाजाने जाती-उपजातीमध्ये गुरफटून राहू नये. चळवळीविषयी त्यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीची सध्या लोकांनी दुकानदारी मांडली आहे. अशा लोकांना धडा शिकविण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या संविधानाची चोख अंमलबजावणी झाल्यास देशात शांतता टिकून राहील. परंतु असे होताना मात्र दिसून येत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)