शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तूर, हरभरा दरात तेजी, किराणा स्थिर

By admin | Updated: March 28, 2016 00:08 IST

जालना : दुष्काळी स्थितीमुळे बाजार समितीत शांतता असली तरी या आठवड्यात तूर, हरभरा, सोयाबीन आदी भुसार मालांचे भाव वाढण्यासोबतच आवकही बऱ्यापैकी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.

जालना : दुष्काळी स्थितीमुळे बाजार समितीत शांतता असली तरी या आठवड्यात तूर, हरभरा, सोयाबीन आदी भुसार मालांचे भाव वाढण्यासोबतच आवकही बऱ्यापैकी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत या आठवड्यात तुरीचे भावत तीनशे ते चारशे रूपयांनी वधारले आहेत. तुरीचे भाव प्रति क्विंटलला ८८०० - ८००० दरम्यान आहेत. गत काही दिवसांपूर्वी भाव कमी झाले होते. आवक ५०० क्विंटलपेक्षा जास्त होत आहे. हरभऱ्याचे भावही ४३०० ते ४४५० दरम्यान आहेत. आवक १ हजार क्विंटल होत आहे. सोयाबीनची आवक दाररोज ४०० क्विंटल एवढी असून, भाव ३९५० ते ३८०० दरम्यान आहेत. भुसार मालाचे भाव बऱ्यापैकी वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गव्हाचे भावही १६०० ते २२०० प्रति क्विंटल दरम्यान आहेत. आवक १ हजार पोत्यांची होत आहे. पेशी गहू ३५०० रूपये प्रति क्विंटल आहे. पेशी गव्हाची आवक तुलनेने कमी आहे. ज्वारीचे भाव १६०० ते २२०० रूपये प्रति क्विंटल आहेत. आवक १ हजार पोत्यांपेक्षा जास्त आहे. भुसार माल वगळता अन्य मालाचे भाव स्थिर आहेत. यात प्रामुख्याने किराणा बाजारात शांतता आहे. लग्नसराई असली तरी मालाची आवक तसेच भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. साखरेच्या भावातही तेजी नाही. साखर बाजारपेठेतही भाव स्थिर असल्याने मालाची आवक कमी आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसारसह विविध अन्य मालाची ठोक दुकाने आहेत. दुष्काळी परिस्थिती तसेच पाणीटंचाईमुळे भाजीपाला तसेच फळ मार्केटही शांत आहेत. टरबूज, खरबूज तसेच शहाळ्यांची आवक वाढत आहे. दिवसाकाठी एक ट्रक माल येत असल्याचे संबंधित व्यापारी सांगतात. अननसची मागणी वाढली आहे. ग्रामीण दुष्काळामुळे शुकशुकाट असल्यामुळे त्याचा परिणाम बाजार समितीत दिसून येतो. एरवी असलेली वर्दळ रोडावली आहे. मोसंबीची आवक किरकोळ स्वरूपाची आहे. या विषयी बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले म्हणाले की, या आठवड्यात भुसार मालाचे भाव वधारले असले तरी इतर मालाचे भाव स्थिर आहेत. विशेषत: तूर, हभरा आदींचे भावात चांगली तेजी आल्याने व्यापारी तसेच शेतकरी समाधानी आहेत. दुष्काळी परिस्थितीचा काहीअंशी परिणाम होत असल्याचे चौगुले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)