शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जनतेला फसवून सरकार सत्तेत आले, शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरणार: अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 19:13 IST

पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करताना महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा झाली नाही, यामुळेच  दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढावली आहे.

छत्रपती संभाजीनगर: महायुतीने निवडणूक काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. आता मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषयावर बोललो नसल्याचे सांगत आहेत. शेतकऱ्यांना फसवून हे सरकार सत्तेवर आल्याचा आरोप विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला.

आ. दानवे म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करताना महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा झाली नाही, यामुळेच दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढावली आहे. कारण या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांविरोधात महायुतीतील दुसरे मंत्री आणि त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन महायुतीने दिले होते. लाडक्या बहिणींनाही दरमहा २१००रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र सत्तेवर येताच लाडक्या बहिणींचे पैसे कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, शिवाय कृषीमंत्री दादा भुसे आणि  उपमुख्यमंत्री अजित दादा हे तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोललोच नसल्याचे म्हणत आहेत. जनतेला फसवून महायुतीत सत्तेत आल्याचा आरोप आ. दानवे यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने ते दरेगाव येथे गेल्याचे बोलले जात आहे, याकडे लक्ष वेधले असता आ.दानवे म्हणाले की, एकनाथ शिंदे आता काहीही करू शकत नाही. कारण अडिच वर्षाच्या मुख्यमंत्रीपाच्या काळात शिंदे यांनी अनागोंदी कारभार केला. त्याचा सर्व रेकॉर्ड भाजपने सांभाळून ठेवला आहे. शिंदेसेना ही भाजपसाठीच काम करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना गांर्भियाने घेतली नाहीअभिनेता सैफ अली  यांच्यावर हल्ला करणारा अवघ्या दोन दिवसांत पकडला जातो. दुसरीकडे मात्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांतील एक आरोपी अद्याप सापडला नाही.  गांर्भियाने तपास केला असता तर चार दिवसांत सर्व आरोपींना अटक झाली असती, असे विरोधीपक्षनेते आ. दानवे म्हणाले. 

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेवारी रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर शिवसेना शाखेच्यावतीने रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, अन्नदान, तसेच अभिवादन असे विविध उपक्रम शहरातील विविध वॉर्डात आयोजित करण्यात आल्याचे आ. दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाAgriculture Sectorशेती क्षेत्र