शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

३३ गावांसह अकरा वाड्यांना टँकरचा आधार

By admin | Updated: June 28, 2014 01:16 IST

अरूण देशमुख, भूम तालुक्यात पावसाळ्याही ९३ गावांपैकी ३३ गावांसह ११ वाड्यात ३३ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. येत्या १५ दिवसात पाऊस झाला नाही असे चित्र सध्या दिसत आहे.

अरूण देशमुख, भूमतालुक्यात पावसाळ्याही ९३ गावांपैकी ३३ गावांसह ११ वाड्यात ३३ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. येत्या १५ दिवसात पाऊस झाला नाही तर टँकरची संख्या आणखी वाढवावी लागेल, असे चित्र सध्या दिसत आहे.तालुक्यात गतवर्षीचा झालेला अल्प पाऊस तर यंदा अद्यापही पाऊस नसल्यामुळे विहिरी, बोअर अखेरची घटका मोजत आहेत. यामुळे टंचाईग्रस्त गावांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत वालवड, अंबी, पाथरुड सर्कलमध्ये सर्वाधिक टंचाई जाणवत असून, विहीर, बोअर, तलाव, हातपंपाची पाणीपातळी दिवसागणिक घटत असल्याने टंचाई वाढत आहे. वालवड गावाला पाणीपुरवठा करणारा हिवर्डा तलाव कोरडाठाक असून, या तलावात दर १५ दिवसाला पाण्यासाठी नवीन ठिकाणी खड्डा घेऊन वालवडला पाणी पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तालुक्यात शहरी भाग वगळता ग्रामीण भागात ९३ गावापैकी ३३ गावे व ११ वाड्या तहानलेल्या असून, टँकरसाठी दिवस-दिवस प्रतीक्षा केली जात आहे. पावसाळा सुरु होवून मृग कोरडा गेला. आर्द्रा सुरु झाल्या तरी पावसाचा पत्ता नसल्याने येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, तालुक्यातील निपाणी येथील ग्रामस्थांनी टंचाईवर मात करण्यासाठी टँकर सुरू करण्याच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविला आहे. ‘जीपीआरएस’ नावालाचतालुक्यात खाजगी टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील गैरप्रकारास आळा बसावा, यासाठी प्रशासनाने जीपीआरएस ही यंत्रणा बसविण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे या टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची आॅनलाईन माहिती तहसील कार्यालयास उपलब्ध होते. तालुक्यातील खाजगी टँकर्सना अशी यंत्रणा बसविल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी येथील तहसील कार्यालयात मात्र अशी कुठलीच यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दिसते. याबाबत तहसीलदार अरविंद बोळंगे यांना विचारले असता खाजगी टँकर्सना ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, या कामाचे कंत्राट घेतलेल्या संबंधित यंत्रणेने अद्याप ती कार्यान्वित केलेली नसल्याचे सांगितले.तालुक्यात एकूण ९३ गावांपैकी ३३ गावे, ११ वाड्यात पाणीटंचाई असून, एकूण ३३ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. यामध्ये ११ शासकीय तर २२ खाजगी टँकरने पाणी पुरवठा होत आहे. तर ३६ विहीर व २१ बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहेत.सभापतींना साकडेतालुक्यातील इराचीवाडी व बागलवाडी येथील परिसरामधील विहीर, बोअर हे पाण्याअभावी अखरेची घटका मोजत असून, यामुळे या परिसरामध्ये ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.पूर्वी केलेल अधिग्रहण, बोअर, विहिरीची पाणीपातळी घटल्याने आता नव्याने पाण्याचा शोध घेवून अधिग्रहण करण्याची वेळ आली आहे. याच अनुषंगाने इराचीवाडी ग्रामस्थांनी शुक्रवारी पं. स. सभापती अण्णा भोगील यांची भेट घेवून पाण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे.