शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
2
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
3
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
4
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
5
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
6
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
7
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
8
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
9
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
10
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
11
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
12
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
13
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
14
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
15
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
16
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
17
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
18
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
19
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
20
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्त झालेल्या प्रकरणांवर कारवाई करा

By admin | Updated: September 4, 2014 00:19 IST

परभणी : लोकशाहीदिनी प्राप्त प्रकरणाबाबत संबंधित विभागांनी त्वरित कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी दिले़

परभणी : लोकशाहीदिनी प्राप्त प्रकरणाबाबत संबंधित विभागांनी त्वरित कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी दिले़
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा लोकशाही दिन कार्यक्रम घेण्यात आला़ अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सिंह होते़ यावेळी पोलिस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी झावरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती़
एस़ पी़ सिंह म्हणाले, सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागाचे काम लोकाभिमुख करण्यावर भर द्यावा, लोकशाहीदिनी प्राप्त प्रकरणात अर्जावर संबंधित विभागांना दिलेल्या सूचना व निेर्देश याबाबत सर्व संबंधित विभागांनी कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले़
सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन, जिल्हाधिकारी, महानगरपालिका, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येतो़ तसेच तालुकास्तरावर देखील राबविण्यात येतो़
या लोकशाही दिनामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविले जात असल्याने समाधान व्यक्त होत आहे़
परंतु, काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे काही प्रकरणे प्रलंबित राहत आहेत़ (प्रतिनिधी)
अर्ज प्रक्रियेबाबत आवाहन
अर्ज स्वीकृतीचे निकष- अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्ऱप़ १ अ ते १ ड) तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, लोकशाही दिनाकरीता अर्जदारांचे अर्ज विहीत नमुन्यात १५ दिवस आधी आणि दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे़ तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लोकशाही दिनासाठी अर्ज करावा.
...तर अर्ज स्वीकारले जात नाहीत
न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपिल्स, सेवा विषयक, अस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यातील नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर वरील प्रमाणे असे अर्ज लोकशाही दिनाकरीता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत. असे अर्ज आठ दिवसांत पाठविण्यात यावे, लोकशाही दिनातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची पोचपावती देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी दिले़