शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

मिटमिट्यातील हायवे लगतच्या शाळेने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 4:53 PM

मुले-मुली शाळेतून सुखरूप घरी येईपर्यंत मिटमिट्यातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. वर्षातून एकदा, दोनदा तरी एखाद्या विद्यार्थ्याला वाहन अपघातात जिवाला मुकावे लागते.

औरंगाबाद : मुले-मुली शाळेतून सुखरूप घरी येईपर्यंत मिटमिट्यातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. वर्षातून एकदा, दोनदा तरी एखाद्या विद्यार्थ्याला वाहन अपघातात जिवाला मुकावे लागते. यास कारण ठरते ती हायवे लगतची शाळा. शाळा भरताना व सुटताना कधी अपघाताची घटना घडेल याचा नेम नसल्याने गावकर्‍यांना सतत धास्ती असते. गावातील सुरक्षित स्थळी शाळेचे स्थलांतर करण्यात यावे, ही मागील २० वर्षांपासूनची गावकर्‍यांची मागणी. मात्र, शाळेऐवजी शहरातील कचरा गावाच्या डोक्यावर आणून टाकण्याचा घाट ‘मनपा’ने घातला होता. यामुळेच मिटमिटावासीयांचा संयमाचा बांध फुटला. 

औरंगाबाद-नाशिक महामार्गालगत अनेक गावे वसलेली आहेत. त्यातीलच एक मिटमिटा. येथील महानगरपालिकेचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हायवेलगतच आहे. ही शाळा मिटमिटावासीयांच्या हृदयाचे ठोके वाढविण्यास कारणीभूत ठरते आहे. या महामार्गावरून २४ तास जडवाहने वेगात असतात.इयत्ता बालवाडी ते दहावीपर्यंतचे ६२० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. शाळेच्या समोर ५ ते १० फुटांची मोकळी जागा म्हणजे या शाळेचे मैदान होय. यावरून शाळेच्या बिकट परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. पेव्हर ब्लॉक बसविलेल्या या जागेतच दुचाकी पार्किंग केल्या जातात व तेवढ्याच जागेत विद्यार्थी मधल्या सुटीत डब्बा खातात. हायवेवरून धावणारे जडवाहन कधी अनियंत्रित होईल व शाळेच्या ओट्यावर येईल याचा नेम नाही. 

सकाळी सहावी ते दहावी व बालवाडीचे विद्यार्थी तर दुपारी पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. शाळा भरताना व सुटताना विद्यार्थ्यांना गावात जाण्यासाठी हायवे ओलांडावा लागतो. शाळा सुटली की  विद्यार्थ्यांना पहिले महामार्गालगत उभे केले जाते. महामार्गाच्या दोन्ही बाजूला शिक्षक-शिक्षिका उभ्या राहतात व दोन्ही बाजूंची वाहने थांबवितात. मग विद्यार्थ्यांना महामार्गाच्या दुसर्‍या बाजूस सोडण्यात येते. अनेकदा वाहनधारक शिक्षकांचे ऐकत नाहीत व विद्यार्थी रस्ता ओलांडत असतानाही भरधाव वाहने दामटली जातात. शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी हिवाळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना जीव मुठीत ठेवून रस्ता ओलांडावा लागतो. सर्व विद्यार्थ्यांनी रस्ता ओलांडला की शिक्षकांचा जीव भांड्यात पडतो. शाळा भरताना व सुटल्यावर प्रत्येकाच्या मनात धडकी भरते. शाळेचे स्थलांतरण करणे आवश्यक आहे. 

शाळेचे स्थलांतर करावेमिटमिटालगत २५० एकर गायरान जमीन आहे. ही जमीन सफारीपार्कसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. येथील ५ एकर जागा मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी उपलब्ध करून द्यावी. मनपाने त्यासाठी येत्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद करावी. मागील २० वर्षांपासून आम्ही शाळा स्थलांतराची मागणी करीत आहोत; पण नेहमी दुर्लक्ष करण्यात आले. दरवर्षी शाळेसमोर अपघात होतात. काही विद्यार्थ्यांचा बळी त्यात गेला आहे. मनपा आणखी किती विद्यार्थ्यांचे बळी घेणार आहे. आता तरी मनपाचे आयुक्त, अधिकारी व नगरसेवकांनी जागे व्हावे. - लक्ष्मण बनकर, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, मिटमिटा