शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगा कामांसाठी मजुरांचा रास्ता रोको

By admin | Updated: April 24, 2015 00:36 IST

बदनापूर : दाभाडी येथे मनरेगाच्या कामांसाठी मजुरांची मागणी असतानाही ही कामे ट्रॅक्टरने सुरू झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) च्या वतीने

बदनापूर : दाभाडी येथे मनरेगाच्या कामांसाठी मजुरांची मागणी असतानाही ही कामे ट्रॅक्टरने सुरू झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) च्या वतीने गुरूवारी राजूर-औरंगाबाद मार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये वादही झाला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.लाल बावटाच्या वतीने यापूर्वी २१ एप्रिल रोजी तहसीलदारांना मनरेगाच्या कामांची मागणी करणारे निवेदन देण्यात आले होते. कामे अकुशलमार्फत न होता, ती कुशल पद्धतीने होत असल्याचेही त्यात नमूद केले होते.दाभाडी येथील बांधबंदिस्ताचे काम मजुरांमार्फत होणे आवश्यक असताना ते ट्रॅक्टरने सुरू असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने लाल बावटाच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दाभाडी येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. ज्या गावात मजुरांची संख्या अधिक आहे, त्या गावात यंत्रबंदी करा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन मागे घ्यावे, यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळे आंदोलक व पोलिसांमध्ये काहीसा वाद झाला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आंदोलकांना ताब्यात घेतले. याबाबत आंदोलकांच्या म्हणण्यानुसार रास्ता रोको सुरू झाल्यानंतर महसूल प्रशासनातील अधिकारी किंवा कर्मचारी निवेदन घेण्याासाठी तेथे आले नाहीत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी येथे येऊन निवेदन स्वीकारावे, हीच आमची मागणी होती. पोलिसांनी ही मागणी धुडकावली. त्यामुळे पोलिसांसमवेत वादावादी झाली. पोहेकॉ. रामदास शिलवंत यांच्या फिर्यादीवरुन मारोती खंदारे, भाऊसाहेब जैवाळ, बाबाराव पाटोळे, अनिल गायकवाड, शे. शहारुख शे.गफार आदीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तहसीलदार बालाजी क्षीरसागर म्हणाले की, कार्यालयाबाहेर जाऊन निवेदन स्वीकारणे बंधनकारक नाही. तरीही आमच्या कार्यालयातील मंडळ अधिकारी आंदोलनस्थळी गेले होते. ट्रॅक्टरद्वारे होणाऱ्या कामांबद्दल विचारणा केली असता, तहसीलदार क्षीरसागर म्हणाले, कुशल-अकुशलचे प्रमाण ६०:४० याप्रमाणे आहे. ते साध्य करण्यासाठी काही कामे यंत्राद्वारे करावी लागतात. मजुरांनी नमूना क्रमांक ४ नुसार कामाची मागणी केल्यास त्यांना अन्य ठिकाणची कामे देता येतील, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.