शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

शेतजमिनीचे आरोग्य तपासा अन् उत्पादन खर्चात बचत करा

By बापू सोळुंके | Updated: April 30, 2024 20:04 IST

शेत जमिनीचा पोत पाहूनच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर करावा, यासाठी केंद्र सरकारने ‘स्वाईल हेल्थ मिशन’ ही योजना आणली आहे.

छत्रपती संभाजीनगर : जास्तीतजास्त उत्पादन मिळावे यासाठी दरवर्षी शेतकरी शेतात भरमसाट रासायनिक खतांचा मारा करीत असतात. मात्र, यामुळे बऱ्याचदा गरज नसताना जमिनीमध्ये रासायनिक खतांची मात्रा अधिक होते. परिणामी, उत्पादन खर्चाच्या तुलनेत पिकावरील खर्च अधिक होतो. ही बाब टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधी माती परीक्षण करावे, जमिनीची आरोग्य पत्रिका पाहूनच खताचे नियोजन करण्याचा सल्ला कृषी विभागाच्या जिल्हा मृद चाचणी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

शहरातील शहानूरवाडी येथे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या कॅम्पसमध्येच जिल्हा मृद चाचणी अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. अत्याधुनिक माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. मातीचे परीक्षण करण्यासाठी तंत्रज्ञ आणि अन्य अधिकारी कार्यरत आहेत. शेत जमिनीचा पोत पाहूनच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर करावा, यासाठी केंद्र सरकारने ‘स्वाईल हेल्थ मिशन’ ही योजना आणली आहे.

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील गावे निवडण्यात आली. गतवर्षी जिल्ह्यातील ६ हजार ४८० माती नमुन्यांचे परीक्षण करण्याचे लक्ष्य जिल्हा मृद चाचणी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. ३१ मार्चपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण केले. शिवाय राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गतही २ हजार ३१० माती नमुन्यांचे परीक्षण करण्यात आल्याची माहिती जिल्हा मृद चाचणी अधिकारी भीमराव वैद्य यांनी दिली. वैद्य म्हणाले, “शेतकऱ्यांनी दरवर्षी शेतातील माती नमुन्याचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. शेतजमिनीची आरोग्य पत्रिका आमच्या कार्यालयाकडून तयार करून घेतल्यानंतर जमिनीचा पोत कसा आहे, याची माहिती मिळते. जमिनीमध्ये अस्तित्वात असलेले घटक आणि कोणत्या घटकांची कमतरता आहे, याची माहिती मिळते. यामुळे रासायनिक खतांचा अनावश्यक वापर टाळता येतो.

माती परीक्षणामुळे फायदादरवर्षी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे, मार्च ते मे अखेरपर्यंत माती नमुने प्रयोगशाळेकडे देऊ शकतात. माती परीक्षणामुळे जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाश, सल्फर, जस्त तसेच लोह, झिंक इ. घटकांची माहिती मिळते. यासोबतच शेत जमिनीतील सेंद्रिय कर्बचे प्रमाणही कळते. जमिनीत सेंद्रिय कर्बच नसेल तर रासायनिक खतांचा कितीही वापर केला तरी त्याचा पिकाला लाभ होत नाही. अनावश्यक रासायनिक खतांचा वापर टाळता येतो. परिणामी, उत्पादन खर्च कमी होतो.- भीमराव वैद्य, जिल्हा मृद चाचणी अधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी