शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

नाग, पाल, विंचू यंदा सात दिवस एकत्र

By admin | Updated: July 28, 2014 00:57 IST

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रा नागपंचमीदिवशी साजरी केली जाणार असून, त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रा नागपंचमीदिवशी साजरी केली जाणार असून, त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साप, पाल, विंचू या उभयचर प्राण्यांचे मंदिर परिसरात शनिवारी सकाळी १० वाजता आगमन झाले. हे प्राणी एकत्रीत सात दिवस राहणार आहेत. यात्रेत खरगा, गण, भाकणूक, पालखी मिरवणूक हे कार्यक्रम होणार आहेत.आषाढ अमावस्येदिवशी एकमेकांचे शत्रू समजले जाणारे साप-पाल-विंचू या प्राण्यांचे आगमनापूर्वी पुजारी कल्याण स्वामी यांना मानकरी हरी डोके या मानकऱ्यांच्या घरी आंघोळ घालून मंदिरात नेण्यात आले. तेथे पुजाऱ्याच्या हाताला विधीवत कंकण (काकनऊ) बांधण्यात आले. अमावस्येपासून यात्रेच्या औपचारिकतेस प्रारंभ होतो. बुधवारी पहाटे ४ वाजता पुजाऱ्याचे केस कापले जातात. हा विधी मंदिरासमोर असणाऱ्या दगडी शिळेवर पार पडतो. त्यास खरगा असे म्हणतात. १ आॅगस्ट रोजी नागपंचमीदिवशी पहाटे नागोबा मूर्तीस अभिषेक घालण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता पुजारी कल्याण स्वामी व पालखी मिरवणूक वाजत गाजत गावातून काढण्यात येणार आहे, त्यास गण असे म्हणतात. सायंकाळी ६ वाजता मंदिराजवळ मिरवणूक आल्यानंतर तिथे महाआरतीने नागोबास ओळखले जाते. मंदिराशेजारी ओट्यावर भाकवणूक कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे. यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी माजी जि.प. सदस्य संतोष बोबडे, रामेश्वर तोडकरी, सरपंच प्रभावती मारडकर, उपसरपंच आनंद बोबडे, राजकुमार पाटील आदींसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. तसेच तुळजापूर आगाराच्या वतीने जादा बसेसचीही सोय करण्यात आली आहे.अतिक्रमण हटविलेयात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मुख्य चौकात तसेच रस्त्यालगत झालेले अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. त्यामुळे यात्रेत या चौकात वाहनांची कोंडी होणार नाही याची दक्षता ग्रामपंचायतीने घेतल्याचे उपसरपंच आनंद बोबडे यांनी सांगितले. (वार्ताहर)सावरगावात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागलीशनिवारी मंदिरासमोर आगमन झालेल्या साप-पाल-विंचवाचा मुक्काम यंदा दोन दिवसांनी वाढला आहे. हे एकमेकांचे हाडवैरी असणारे प्राणी सात दिवस एकत्रीत राहणार आहेत. या दुर्मिळ दश्याच्या दर्शनासाठी भाविक सावरगावला येत आहेत. तर यात्रेत सुरक्षितता रहावी, यासाठी तामलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचे सपोनि राहुल देशपांडे यांनी सांगितले. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवस भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.माळा बनविण्याचे काम सुरुलिंबाऱ्याच्या पालापासून गोलाकार माळा बनविण्याचे काम हरी विश्वनाथ डोके यांच्या घरी शनिवारपासून चालू झाले आहे. ते मागील ५० वर्षापासून माळा तयार करण्याचे काम करतात. अख्खे कुटुंब सलग पाच ते सात दिवस निष्काम सेवा करतात. त्यात कसलाही मोबदला घेत नाहीत. या तयार केलेल्या माळा नागपंचमीदिवशी गण मिरवणुकीत भाविक गळ्यात घालतात. ही लिंबाऱ्याची माळ वर्षभर घरात अडकवतात त्यामुळे घरात सापांचा वावर होत नाही, अशी आख्यायिका आहे.